Uncategorized

Categories
Uncategorized

कॅन्सरशी मैत्री करू या !

मागील १० दिवसात मुंबई व नागपूर येथील कॅन्सर झालेल्या दोन व्यक्तींशी प्रत्येकी २० मिनिटे फोनवरच बोलणे झाले. कॅन्सरबद्दल काही बेसिक माहिती, कॅन्सर होण्यामागे व तो बरा होण्यासाठी/नियंत्रणात  ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करायला हवेत, आहार व मनाच्या पातळीवर करता येण्यासारखे बदल इ. संदर्भात बोललो, काही पुस्तके वाचायला सुचाविलीत, त्या संवादाने त्यांच्या मनावरचा भर कमी झाला, प्रथमच कोणीतरी असे आश्वासक बोलल्याने खूप बरे वाटले व आजाराशी लढण्याला आणखी बळ मिळाले असे त्यांनी सांगितले. माझा तो दिवस खूप छान व सार्थकी लागला या आनंदात गेला. 
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.
Categories
Uncategorized

Audio speech “Mind Power & Human Energy” given by Dr Avinash Saoji

Listen my audio speech “Mind Power & Human Energy” given during training of faculties of Govt. Eng College, Amravati. http://ia601207.us.archive.org/4/items/mindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGcoeAmravati/MindPowerHumanEnergySpeechByDr.AvinashSaojiAtGovt.Eng.CollegeAmravatiFacultiesTraining.mp3
Categories
Uncategorized

Reflection on the eve of completing 51 years of my life

Reflection on completing my 51 years of life
I am completing 51 years of my life on tomorrow (7 th May) this year. I have already decided to live for a total of 100 meaningful years. So now I have only 49 years remaining & there are lot many things to do, before I depart from this world. I have started this kind of “countdown” from my last birthday only. It helped me in becoming more focused & choosy regarding utilizing my time for meaningful activities. Now I don’t want to waste time for smaller & meaningless things. I became more affirmative, assertive because of this changed way of looking towards my own life. My communication became more effective & impactful. I am enjoying & experiencing more life, joy, satisfaction & contentedness in my living. I am feeling more energetic with good physical & mental stamina. All this could happen only because of the grace of God & well wishes of friends like you. Keeping my last day of my life in the background of my daily routine, like the antivirus program working in our computers also helped a lot. 

Now I want to invite you to think & reflect back like this & experience the joy & meaningfulness of life like me. GIVING is a very simple way of experiencing it. As a friend & well wisher of you, I want you to start doing something about GIVING in your life. It could be in form of money, time, love & affection, skills and or any other form. You can find out someone/something where your GIVING can make a significant change in someone’s life.

One way of doing it by contributing to various PRAYAS-Sevankur activities. The recurring expenses of Prayas-Sevankur are around 15 Lakhs Rs. this year. In addition to this we need to start & complete our own building “Prayas-Sevankur Bhavan” of 9500 sq. feet at Farshi Stop, Amravati. It will cost around 100 Lakhs Rs. It will be the homely training centre (actually a recharging station) for the children, youths and all others.

I expect from you a monthly or yearly voluntary donation for PRAYAS-Sevankur, as my birthday gift along with your well wishes. It will help me in concentrating on the real content of my work & not on thinking & collecting the funds, to run the activities.

The monthly / yearly contribution could be any amount you think you could give. You can give it by giving standing instructions to your bank to transfer the amount to the bank account of PRAYAS (details given below) every month or year on a specific day of the month or the year. Another way could be you can give it to our collection volunteers. (You yourself can become such a collection volunteer for minimum of 10 contributors.) You also can ask & motivate your other family members & friends to start GIVING this way.

In addition to the monthly / yearly contribution, one time donation for the “Building Fund” is also needed & expected.        

Donations should be made by cash/ account payee Cheque or DD drawn in favor of
 (You can directly deposit it in our following Bank accounts also)
1. “PRAYAS” Union Bank of India, Saving Bank Account no. 323302010064340 (Amravati Branch- IFSC – UBIN0532339)
2. “PRAYAS Chandur Bazar” State Bank of India, Saving Bank Account no.11590669883 (Chandur Bazar branch, Dist. Amravati. IFSC- SBIN0002147)
3.  “PRAYAS Chandur Bazar” ICICI Bank, Saving Bank Account no.042801001011 Amravati branch, Dist. Amravati.
 Donations to PRAYAS are entitled to 50% tax exemption u/s 80G of Income Tax Act.
PRAYAS is having FCRA Registration & can accept foreign donations also. (FCRA Reg. No. 083730013 / dated 02.09.1998)

Categories
Uncategorized

Intro video of “Sevankur Little Champs” program by Dr Avinash Saoji at Jalgaon, which is highly inspirational & appreciated by thousands of spectators at Jalgaon, Nagpur, Wardha, Amravati & Yavatmal. Some selected challenged children share their life story & the struggle they faced for their outstanding achievements.



One of “Sevankur Little Champs” Suyash Khandekar being introduced by Dr Avinash Saoji.



One of the “Sevankur Little Champs” narrating his story of struggle & victory.

Categories
Uncategorized

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू उभे करून सर्व समाजाला जगण्याची ताकद देणारा हृदयस्पर्शी उपक्रम

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू व मनामध्ये जिद्द निर्माण करून  
अर्थपूर्ण  ज गण्यासाठी ताकद देणारा प्रेरणादायी व हृदयस्पर्शी उपक्रम  

प्रिय मित्रांनो !

सर्व काही व्यवस्थित असून, हातपाय, कानडोळे धडधाकट असूनही, आम्ही आयुष्यात सारखं रडगाणं गात असतो. थोड्या थोड्या अपयशाने खचून जातो, नाही नाही ते नकारात्मक विचार मनात दाटून येतात, स्वत:चेच दु:ख असह्य व भारी वाटायला लागते. एकूणच जगण्यामधील आनंद व उत्साहाचा झरा आटून जातो. अशावेळी गरज असते ती सकारात्मक दृष्टीकोन जोपासून, मार्गात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून काहीतरी मिळवून दाखविणार्‍या जित्याजागत्या आदर्शांची.

असेच काही आयडॉल्स् एकाच मंचावरुन लोकांच्या समोर ठेवणारा प्रयासचा ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा नविन उपक्रम. अतिशय आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी सिध्द झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवावं, त्यासाठी काय करावं यासाठी चिंतेत असलेल्या पालकांना, आयुष्यात वेगळं काही करू पाहणार्‍या तरुणांना, थोड्या-थोड्या अपयशाने निराश होणार्‍या, खचून जाणार्‍या, भरकटलेल्या, जीवनाचा सूर हरवून बसलेल्या, प्रसंगी आत्महत्येचा विचार मनात येणार्‍या अशा सर्वांना, सकारात्मक दृष्टीकोन व जगण्याची प्रेरणा व एक नवी दिशा व आशा मिळाल्याचा अनुभव नुकत्याच जळगाव, नागपूर व वर्धा येथे झालेल्या ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या कार्यक्रमातून दिसून आले.

   
‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ च्या मंचावरून ज्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, संघर्ष आहेत, अडथळे आहेत, तरीही त्यांनी हार न मानता अथक प्रयत्नांनी काहीतरी मिळवून दाखविलेले आहे अशी काही मुले आयडॉल म्हणून लोकांपुढे आलीत. कोणी अंध, कोणी शरीराने विकलांग, कोणी एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त,  तर कोणी घरच्या गरीबीशी झुंज देत शिक्षण घेत असणारे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती व ती म्हणजे जगण्याचा आनंद व उत्साह. समर्थपणे जीवनाशी लढणारी, परिस्थितीविषयी कोणतीही कूरबूर न करता जगायचं कशासाठी व कशारितीने हे ठामपणे सांगणारी भन्नाट ताकदीची ही आगळीवेगळी मुलं. मंचावरून या एकेकाला प्रत्यक्ष पाहून, त्यांची जीवनकहाणी ऐकूनच, त्यांचे अनुभव, जिद्द समजून घेवून अनेकांची आयुष्य बदलतांना दिसलीत.

प्रयास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक व सेवांकुर या तरुणांसाठीच्या खुल्या मंचाचे प्रेरक असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व हजारोंना आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत-मार्गदर्शन करणारे डॉ. अविनाश सावजी यांच्या सातत्यपूर्ण कामामधून व चिंतनातून हा अतिशय प्रेरणादायी व उपस्थितांची हृदये हेलावून सोडणारा उपक्रम साकार झालाय. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ कार्यक्रमात ते स्वत: मंचावर या मुलांशी संवाद साधून त्यांना बोलतं करतात, त्यांच्या कणखर जगण्याची कहाणी सर्वांसमोर उलगडून दाखवितात. यासोबतच ते त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या वाटेने केलेच्या जीवनप्रवासातून, त्यांना स्वत:च्या स्वधर्माचा शोध कसा लागला, गेल्या २८ वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यास व सामाजिक कार्याच्या अनुभवांद्वारे अर्थपूर्ण जीवन का व कशासाठी जगायचे, यश कसे मिळवावे, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व विकास इ. अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात. त्यांची करुणा व तळमळ, त्यांच्या शब्दाशब्दांमधून पाझरते व सर्व उपस्थितांच्या हृदयांना चिंब भिजवून, डोळ्यांमधील अश्रूंद्वारा ती मुक्तपणाने वहायला लागते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सर्व प्रेक्षक/श्रोत्यांना एका वेगळ्याच उंचीवर त्यांच्यासोबतच घेवून विहरतात.  

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये 

१. २२ जानेवारी २०१२ ला पहिला कार्यक्रम जळगाव येथे झाला व त्यानंतर १२ व १९ फेब्रुवारीला  तो नागपूर व वर्धा येथे झाला. अशाप्रकारे एका महिन्याच्या कालावधीतच तीन वेगवेगळ्या शहरात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

२. जळगाव व नागपूर येथे ३५००-४०००, तर वर्धा येथे २५०० प्रेक्षक-श्रोत्यांची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभली होती. आणि हे सर्व आयोजन करणार्‍या प्रयास संस्थेमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची संख्या फक्त चार असतांना. याचाच अर्थ प्रयास-सेवांकुरचे या सर्व ठिकाणी स्वयंसेवक/पाठीराखे यांचे नेटवर्क व त्यांची बांधिलकी किती प्रचंड असणार हे लक्षात येते.

३. कोणी क्रिकेटवीर नाही, कोणी सिनेनट नाही, कोणी राजकारणी नाही, त्या अर्थाने कोणीही सेलिब्रीटी  नाही, मंचावर येणारा एकही चेहरा ओळखीचा नाही, नृत्य-गायन वा अन्य कसल्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तरी एवढ्या मोठ्या संख्येने तीनही शहरांमध्ये कार्यक्रमासाठी लोक आलेत हे एक आश्‍चर्यच मानायला पाहिजे. या कार्यक्रमांचे नियोजन/आयोजन केवळ ५ ते १० दिवसांच्या कालावधीत करण्यात आले होते हे आणखी एक आश्‍चर्य.

४. आज सिनेमा थिएटरमध्येही लोक एका जागेवर दोन तासांसाठीही बसत नाही, या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमासाठी आलेले लोक मात्र साडेतीन-चार तास झालेत तरी जावू इच्छित नाहीत, ही या उपक्रमाची ताकद दिसून आली. केवळ एक चक्कर मारुन निघून जावू वा १० मिनिटे बसू व निघून जावू हे ठरवून आलेले बहुतेक लोक संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय तर स्वत: जात नाहीतच, उलट फोन करुन घरी राहिलेल्यांना व इतर मित्रांना आग्रहपूर्वक कार्यक्रम बघण्यासाठी तातडीने बोलावून घेतात हे कशाचे द्योतक आहे ?
५. प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट श्रोता/प्रेक्षक वर्ग असतो. मुलांच्या कार्यक्रमामध्ये मोठे फार रमत नाहीत, तर मोठ्यांच्या कार्यक्रमात मुले कंटाळतात. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा एक असा कार्यक्रम ठरला की घरातील तीनही पिढ्यांना जो सारखाच भावतो व त्यामुळे मुले, त्यांचे पालक व आजी-आजोबा अशा तीनही पिढ्यांना त्यामधून स्वत:साठी काहीतरी मिळते.
६. तीनही ठिकाणी अशा प्रकारची अनेक स्थानिक लढणारी कणखर मुले शोधता आलीत व त्यांना पण मंचावर सर्वांच्या पुढे सादर करता आले. त्यामुळे अशी मुले काही फक्त मंचावर आलीत तीच आहेत असे नव्हे, तर आपल्याही शहरात, गावात, गल्लीत, शेजारी पण असे आदर्श असू शकतात व त्यांचा शोध घेण्याची दृष्टी या कार्यक्रमाद्वारे सर्व उपस्थितांना लाभते हे लक्षात आले.
७. मंचावर कोण मुले लोकांपुढे आलीत हे पण फारसे महत्वाचे नसल्याचे अनुभवास आले. जगण्यात संघर्ष, त्यावर मात करुन काहीतरी मिळविले आहे व हे सर्व जीवनमूल्यांना जपून, ही त्रिसूत्री ज्यांच्या आयुष्यात आहे अशी कोणीही ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ म्हणून लोकांना तेवढीच भावतात असे दिसून आले.
८. मंचावर सादर होणार्‍या मुलांसाठी तर हा कार्यक्रम त्यांच्या असलेल्या आजारासाठी, त्यांच्या विकलांगतेसाठी, समस्येसाठी एक थेरेपी ठरतो. उदा. पाणेरी या मुलीच्या बोलणे, हस्ताक्षर, स्नायूंची शक्ती व हालचालींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. राणी या मुलीला अद्याप एचआयव्हीसाठी एआरटी औषधोपचार सुरु करण्याची गरज भासलेली नाही.
९. मंचावरील मुलांप्रमाणेच समोर बसलेल्या शरीराने धडधाकट असणार्‍या व सर्व काही व्यवस्थित असूनही मनाने अपंग असणार्‍या सर्वांसाठी पण ही एक थेरेपी ठरते असे दिसून आले. अनेकांनी आमची निराशा दूर झाली, तणाव कमी झालाय, आमची समस्या ही आता फारच किरकोळ वाटायला लागली असे सांगितलेय. एकूणच समाजाच्या सर्वच थरात पसरलेल्या सामूहिक निराशा व नकारात्मक विचारांसाठी ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा कार्यक्रम एक मास थेरेपी म्हणून उपयोगी पडत असल्याचे दिसून येते.
१०. मंचावरुन लोकांपुढे आलेल्या मुलांना मदत करण्यासाठी प्रेक्षक/श्रोत्यांमधून कोणीतरी लगेच स्वत:हून समोर येतांना सगळीकडेच दिसून आले. उदा. सुयश या मुलाच्या पुढच्या सर्व शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उपस्थितांपैकी बीडच्या एका प्रेक्षकांनी उचलली. जळगावच्या तेजस या अतिशय गोड गळा असणार्‍या अंध मुलाला संगीत शिकविण्यासाठी जळगावचेच एक संगीत शिक्षक समोर आलेत. याप्रकारे काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणार्‍यांना पण या कार्यक्रमातून एक रस्ता मिळतोय असे दिसते.
११. तीनही ठिकाणच्या कार्यक्रमांची जी दखल ज्याप्रकारे सर्वच वृत्तपत्रांनी घेतली तो पण एक सुखद आश्‍चर्याचा धक्का होता. सगळीकडेच कार्यक्रमाच्या बातम्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये, जवळपास संपूर्ण पाव ते अर्धा पेज छापून आल्यात. बातम्यांचे मथळेच अतिशय वेधक होते. ‘सेवांकूर लिटील चॅम्प्सनी जळगावकरांना जिंकले, सकारात्मक विचारांचे धडे दिलेत, जगण्यची एक नवी दिशा दिली, सेवांकुर लिटील चॅम्प्स् देवदूताच्या स्वरुपात नागपूरात अवतरलेत, त्यांनी सर्वांना रडविले, वर्धेकर गहिवरलेत असे होते. या बातम्या वाचूनच अंगावर शहारे येतात व डोळ्यांमध्ये अश्रू अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित नसणार्‍या अनेकांनी दिल्यात.
१२. अगदी व्यावसायिक प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला सुध्दा या पातळीचा प्रतिसाद, गर्दी, प्रसिध्दी व परिणामकारकता पहिल्याच प्रयोगापासून मिळाल्याचे ऐकिवात नाही. सर्वच दृष्टीने नितातं सुंदर व हृदयस्पर्शी ठरलेल्या या उपक्रमाला सर्व महाराष्ट्रात व देशातसुध्दा घेवून जाण्याचा संकल्प ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ चे जनक डॉ. अविनाश सावजी यांनी केलेला आहे.
१३. या कार्यक्रमाला अल्पावधीतच हे जे यश व उंची प्राप्त झालेली आहे, त्यामागे मंचावर येणारे लिटील चॅम्प्स् तर आहेतच. पण त्याचबरोबर डॉ. अविनाश सावजी यांचे अतिशय अर्थपूर्ण व हृदयाला हात घालणारे निवेदन, त्यांची तळमळ, त्यांची गेल्या २८ वर्षांची निस्वार्थ व निरपेक्ष समाजसेवेची साधना, वागण्या-बोलण्यातील सहजता, जगण्यातील साधेपणा, शब्दाशब्दांमधून प्रगट होणारे निगर्वी व अनाग्राही परंतु ठाम व्यक्तिमत्व, सर्वच वयोगटातील व विविध सामाजिक स्तरातील लोकांसोबत त्यांच्याच भाषेत सुसंवाद साधण्याचे कौशल्य या पण बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यांच्या उस्फुर्त व अतिशय अनौपचारिक निवेदनातून प्रत्येकालाच काहीतरी नविन जीवनोपयोगी सूत्रे मिळतात. दरवेळी त्यामध्ये नाविण्य सुध्दा असते.
१४. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हे डॉ. अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकुरच्या प्रयोगशाळेत शोधल्या गेलेले एक अगदी कोरे करकरीत साधन. अनेकांची आयुष्य बदलविण्याचे सामर्थ्य असलेले, एक प्रचंड ताकदीचे हत्यार पेलण्यासाठी, तेवढेच सामर्थ्यशाली असलेले डॉ. अविनाश सावजी यांचे व्यक्तिमत्व व सेवांकुर लिटील चॅम्प्स् च्या स्वरुपात समोर आलेली दुर्दम्य इच्छाशक्ती व  प्रचंड ताकदीची मुले. लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचविण्यासाठी आपण संपर्क करु शकता.
१५. एप्रिल महिन्यात हाच कार्यक्रम अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे दि. २१, २२ व २३ तारखांना होत आहे. आपल्या शहरात असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयास अमरावती येथे संपर्क करा.
Categories
Uncategorized

यशाची मूलभूत साधने

यशाची मूलभूत साधने
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी व समर्थपणे सर्व आव्हाने पेलण्यासाठी, आम्हाला आमची कौशल्ये, क्षमता व गुणांचे संवर्धन करावे लागणार. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने स्वत:चे निरीक्षण करणे, गरजेनुसार स्वत:च्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर, विविध प्रयोग करुन, आवश्यक ते परिवर्तन करणे ही आवश्यक असेल. स्वत:मध्ये असणार्‍या कौशल्ये, क्षमता व गुणांचा शोध घेणे व त्यामध्ये सतत भर घालण्यासाठी प्रयत्न करत राहणे महत्वाचे असेल. हे सर्व शिकण्यासाठी व प्रत्यक्ष कृतिमध्ये आणण्यासाठी, अशा काही चाकोरी सोडून जगणार्‍या यशस्वी व्यक्तिमत्वांचा सहवास व त्यांच्या अनुभवांचे शेअरींग खूपच उपयोगी व मार्गदर्शक ठरु शकेल. काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍यांसाठी तर हे नक्कीच दिशादिग्दर्शक ठरु शकेल.
विज्ञान हे आमच्या दैनंदिन जगण्यामध्ये येणे, आमच्या प्रत्येक विचार व आचारामध्ये येणे म्हणजे खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. याप्रकारे विज्ञाननिष्ठ होता आलं तर आमचे जीवन हे बदलणारच. त्यासाठी स्वत:च्या आयुष्यात प्रयोग करत राहणे मात्र गरजेचे आहे. आम्ही अशाप्रकारे स्वत:ला कधी तपासलेले नसते. त्यामुळे स्वत:ला स्वत:ची ओळखसुध्दा फारच अपुरी असते. त्यामुळे स्वत:ला खर्‍या अर्थाने ओळखणे, स्वत:चा शोध घेणे, अशा प्रकारे सुरुवात करता येऊ शकते.
त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घ्यायला पाहिजे. या जगामध्ये राहणार्‍या सातशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसेसुध्दा सारखे नसतात. मग जर आमचा प्रत्येकाचा अंगठ्याचा ठसासुध्दा सारखा नाही, याचाच अर्थ माझ्यामध्ये नक्कीच असे काहीतरी वेगळे आहे, जे या संपूर्ण जगामध्ये फक्त माझ्यामध्येच आहे व इतर कोणाहीमध्ये ते नाही, याचा शोध लागला तर कायम स्पर्धा करण्याची गरज राहणार नाही. दुसर्‍या बाजूने आमच्यामध्ये एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्यामध्ये काहीतरी समान आहे. या समानतत्वाचा शोध लागल्यास प्रत्येकाशी माझे नाते जडेल. अशाप्रकारे या दोन अंगांनी स्वत:चा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतो. असा शोध घेणे हाच माणसाचा जगण्याचा हेतू असावा. असा शोध घेणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेवू शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोलीसुध्दा आपोआपच वाढेल. आनंद व खर्‍या अर्थाने मस्तीमध्ये प्रत्येक क्षण जगते येईल.
मला काहीतरी नविन शिकायचे आहे वा माझ्यकडे असलेले काहीतरी मला द्यायचे आहे, ही वृत्ती आम्हाला जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करते. सामान्य व असामान्य किंवा यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो. जसा एखादा मूर्तिकार छन्नी-हातोडा घेवून मूर्ती कोरतांना दगडावर घाव घालत असतो. १०-२०-५० घाव लागोपाठ मारूनही जेंव्हा दगड फुटत नाही तेंव्हा त्याला जर वाटले की ५० वेळा घाव घालूनही दगड फुटला नाही याचाच अर्थ पुढचे ५० घावही दगड फुटणार नाही आणि त्याने प्रयत्न करणे सोडून दिले तर तो अयशस्वी ठरतो. यशस्वी व्यक्ती प्रयत्न सोडत नाही व बरेचदा तो दगड ५१ व्या घावातच फुटतो. म्हणजेच यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये ५० घावांचे अंतर नसते, तर बरेचदा केवळ एकाच घावाचे अंतर असते. आपल्यापैकी अनेक लोक यशप्राप्तीसाठी प्रयत्न करून ही अयशस्वी झालो असू तर यशापासून आपण काही पावलेच दूर होतो हे विसरू नका व प्रयत्न सोडू नका. यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ टाकल्याशिवाय राहणार नाही.
शरीर, बुद्धी, मन व वेळ आणि पैसा ही यशप्राप्तीची मूलभूत साधने आपण कशी वापरतो यावर आपलं भविष्य अवलंबून असते. एखाद्या कारागिराला जशी आपली हत्यारे नेहमी धारदार ठेवावी लागतात व काळजीपूर्वक वापरावी लागतात, तशीच आपणही ही पाच हत्यारे कायम धारदार कशी राहतील व त्यांचा योग्य तो वापर कसा करायचा याचा विचार करावा लागेल व यावरच आपलं भविष्य व भवितव्य अवलंबून असेल.

माणसाचं आयुष्य तो किती वर्ष जगला यावर नाही तर, किती अविस्मरणीय क्षण जगला यावरून मोजायचे असते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून तर आपण शिकतच असतो. खरी कसोटी तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून शिकण्यात असते. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्या नजरेने पहायला शिकणे ही खरी दृष्टी असेल. यालाच गुणग्राहकता असेही म्हणतात. ही सर्वांकडून शिकण्याची वृत्ती कायम राखणे आम्हाला समृध्द बनवित असते. ‘‘ज्या लोकांना कशासाठी जगायच हे माहिती असते, ते कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतात. ज्यांना हे माहिती नसते ते लोक आयुष्यभर कसं जगायचं याच चक्रात अडकलेले असतात.’’ मी कशासाठी जगतो आहे, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, हे जर मला नाही कळले तर आयुष्य नुसतेच खाण्यापिण्यात व निरर्थक गोष्टी करण्यात वाया जाईल. आयुष्य हे एकदाच मिळते व ते अमूल्य आहे. मग ते केवळ पैशांसाठी एक्सेंज करणे हा मूर्खपणा असेल. त्याहून मोठे काहीतरी आयुष्यात करायचे आहे, ते काय असेल ते तुमच्यासाठी तुम्हालाच ठरवायचं आहे.
(यशस्वी व्हा या मी लिहिलेल्या पुस्तकामधून घेतलेला लेख) 

Categories
Uncategorized

माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी …….
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)
Categories
Uncategorized

आपले वजन : आपल्या जीवनशैलीचे निदर्शक

आपले वजन : आपल्या जीवनशैलीचे निदर्शक

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयास द्वारा “हृदयविकार निवारण व प्रतिबंध” या विषयावर जागृतीसाठी विविध उपक्रम राबवितांना समोर आलेला सर्वात महत्वाचा प्रश्‍न म्हणजे वाढलेले वजन कसे कमी करावे ? तसेही एकूणच या विषयबाबतचे असलेले अज्ञान व बर्‍याचशा चुकीच्या समजूती लक्षात येत होत्या. आपले वजन किती असावे, ते का वाढते, वाढलेले वजन कसे कमी करता येवू शकते, इत्यादि प्रश्‍नांबाबत शास्त्रशुध्द पण व्यावहारिक माहिती सामान्य लोकांना तर नाहीच, आम्हा डॉक्टरांनाही नेमकेपणाने नसते. या सर्वाचा परिणाम वजन कमी करणे म्हणजे काहीतरी अशक्य व अतिशय कठीण अशी बाब वाटते. बरेचसे लोक मग काहीतरी शार्टकट शोधण्याच्या मागे लागतात. प्रयत्न करुन ही वजन कमी न झाल्याने हताश होवून आशा सोडून देतात. आमच्या मागील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे वजन आटोक्यात ठेवणे तेवढेसे कठीण नाही हे समजले. याबाबत अनेक पुस्तकांच्या वाचनातून, तसेच वजन कमी करण्यासाठी प्रत्यक्ष सल्ला देतांना व दिलेला सल्ला अमलात आणतांना येणार्‍या अडचणींवर व्यवहार्य व सहजसाध्य उपाय शोधून काढता आले. त्यांचा अनेकांना आपली वाढलेली वजने कमी करायला अतिशय उपयोग झाल्याचे दिसून आले.

पहिला

उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर वाढणे), हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, सांधेदुखी, स्पॉंन्डीलायटीस यासारख्या अनेक आजारांचे एक महत्वाचे कारण म्हणजे वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे. एवढेच नव्हे तर वजन हे आरोग्याचे व एकूणच जीवनशैलीचे सहज मोजता येण्याजोगे निदर्शक आहे. वजन योग्य तेवढे राखता येण्यासाठी ज्या प्रकारची जीवनशैली आवश्यक असते, त्याद्वारे अनेक आजारांचा सहजच प्रतिबंध करता येतो.

आज भारतामध्ये शहरी लोकांमध्ये जवळपास ५०-६० % लोक हे प्रमाणापेक्षा जास्त वजनदार आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. मुख्यत्वे बैठी जीवनशैली व गरजेपेक्षा जास्त व चुकीचा आहार यामुळे असे होत आहे. आधुनिक सुखसुविधांमुळे आपल्याला नको असणारे श्रम वाचतात हे खरे; पण त्यामुळेच आपल्याला नको नकोसे असणारे चरबीचे थरही शरीरावर जमा होतात.

आपले वजन किती असायला पाहिजे ते ठरविण्यासाठी वेगवेगळी सूत्रे आहेत. त्यापैकी सर्वात सोपे सूत्र म्हणजे, वयाच्या २०-२२ व्या वर्षीचे वजन आयुष्यभरासाठी आदर्श असते हे होय. त्यामुळे त्यात भर पडू देवू नये. त्या वजनात झालेल्या दर किलो वाढीमागे, हे आजार होण्याचा धोका २% ने वाढतो. 

साधारणत: शरीराची वाढ २०-२२ व्या वर्षी पूर्ण होते. त्यानंतर वजनात भर पडते ती एकतर व्यायामाद्वारे स्नायू व हाडांच्या वजनात भर पडल्याने किंवा जास्तीची चरबी जमा झाल्याने. स्नायू व हाडांमध्ये भर पडल्याने वजन वाढलेले असल्यास चांगलेच आहे. मात्र चरबी जमा झाल्याने वजनात भर पडलेली असल्यास मात्र धोक्याची बाब आहे. बहुसंख्य लोकांच्या वजनात वयाच्या २०-२५ नंतर भर पडते ती जास्तीची चरबी जमा झाल्याने. वजनात जवळपास १२५ ते १५० % वा जास्तच भर पडते. त्यामुळे आजारांचा धोकाही वाढतो.

वरील सूत्र शास्त्रीय वाटत नाही ना ? कारण आम्हाला सवय झालेली आहे की विज्ञान एवढे साधे, सोपे कसे काय असेल ? विज्ञान म्हणजे काहीतरी लवकर न समजणारे, अवघड, तांत्रिक असा आमचा (गैर) समज झालेला असल्याने असे होते. मुळात विज्ञान हे सर्वांना सहज समजणारे व सामान्य लोकांच्या आवाक्यात असते. पण दुर्दैवाने ते एकतर प्रयोगशाळेत (लॅबोरटरीज) वा तज्ञांच्या डोक्यात अडकलेले दिसते. प्रत्यक्ष जीवनात ते कमीच आढळते.

वाढलेले वजन कमी केल्यास, दर किलोमागे सरासरी २ ते ३ महिन्यांनी आयुष्य वाढते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. असेही म्हणतात की कॅन्सरवर रामबाण औषध सापडले व येथून पुढे कोणीही कॅन्सरने दगावले नाही, तर मानवजातीचे सरासरी आयुष्यमान दोन वर्षांनी वाढेल. या तुलनेत जर सर्वांना आपापली वजने योग्य प्रमाणात राखता आली, तर मात्र मानवजातीचे सरासरी आयुष्यमान ८ वर्षांनी वाढेल. म्हणून वजन योग्य त्या प्रमाणात राखणे एवढे महत्वाचे आहे. शिवाय वजन कमी करणे हे कॅन्सरवर औषध शोधण्यापेक्षा कितीतरी सोपे व सहजसाध्य, तसेच बिनाखर्चाचे आहे. 

वजन किती असावे यासाठीचे दुसरे सर्वमान्य सूत्र बी. एम.आय : (बॉडी मास इंडेक्स) यासाठी, वजन भागिले ऊंचीचा वर्ग (मीटरमध्ये) हे सूत्र वापरतात. हे गुणोत्तर  १८.५ ते २१ असावे. बी. एम.आय २१ पेक्षा जसाजसा वाढेल, तसा आजार होण्याचा धोका ही वाढत जातो. या सूत्रानुसार सर्व प्रौढांसाठी किती उंचीला किती वजन असावे ते काढता येते. 
बी. एम.आय = वजन भागिले उंचीचा वर्ग (मीटर मध्ये)

ं  १८.५ ते २१ दरम्यान असेल तर चांगले. हृदयविकार, डायबिटीस इत्यादी आजार होण्याचा धोका कमीत
    कमी.
ं  २१ ते २५ असेल तर बॉर्डर लाईन वजन, विशेषत: डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. पर्यायाने
    हृदयविकाराचा ही.
ं  २५ ते ३० असेल तर, वजन जास्त व लठ्ठपणाची सुरुवात. आजारांचा धोका जास्त. वजन लगेच कमी
     करायला हवे.
ं  ३० पेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणा, ताबडतोब उपचार सुरु करायला हवेत. आजारांचा धोका सर्वाधिक.

वजन जास्त असल्यास हाडांचे व सांध्यांचे आजार ही जास्त होतात. कारण वजन जेवढे जास्त तेवढी सांध्यांची झीज जास्त होणार. त्यामुळे गुडघे लवकर कामातून जातात व कंबर दुखणे पण सुरु होते. म्हणून वजन नियंत्रणात ठेवायला हवे. या दोनही सूत्रांनुसार आपले वजन किती असायला हवे हे ठरविता येईल.

वेस्ट : हिप (कंबर : नितंब) रेशो : कमरेचा घेर हा नितंबाच्या घेरापेक्षा लहान हवा. हा रेशो ०.८५ पेक्षा जास्त नको. कमरेचा घेर हा केंव्हाही ३६ इंचापेक्षा जास्त नको. भारतीय पुरुषांमध्ये चरबीचा साठा मुख्यत्वे पोटाभोवती होत असल्याने हा बराच जास्त असतो. चरबी जमा झाल्याने पोटाचा घेर वाढणे, बहुधा पुरुषांमध्ये घडते व हे जास्त घातक असते. त्यासाठी पोटाचा घेर हा कमरेच्या तुलनेत कमी असला पाहिजे. यासाठी पुरुषांनी प्यांट ढिली होते आहे की घट्ट, याकडे लक्ष असू द्यावे. पोट आणि छाती एका सरळ रेषेत असायला हवी. छातीचा घेर हा पोटाच्या घेरापेक्षा थोडा जास्त असावा. निदान सारखा तरी असावा. 

वजन का वाढते व ते कसे कमी करायचे ते आता आपण पाहू या.

शारीरिक वाढ २०-२२ व्या वर्षी पूर्ण होते. त्यानंतर वजन वाढते ते, एकतर व्यायामाद्वारे स्नायूंमध्ये भर पडल्याने किंवा जास्त करुन चरबी जमा झाल्याने. स्नायू बळकट होवून वजनात भर पडली असेल तर, चांगलेच आहे. पण चरबी जमा झाल्याने वजनात भर पडल्यास मात्र धोका वाढतो. बहुधा तसेच घडते, म्हणून या वयानंतर वजनात भर पडू देवू नये. 

हल्ली बरीचशी मुले लहान वयापासूनच लठ्ठ असतात. कारण शरीरश्रम नसणे (तास न तास टीव्ही, कम्प्युटर समोर बसणे, मैदानी खेळ न खेळणे) व चुकीचे व भरपूर खात राहणे (फास्स्ट फुड, मिठाया, तळलेले चमचमीत पदार्थ). हा झाला भविष्यकाळासाठीचा धोक्याचा इशारा. असे असल्यास लहान वयापासूनच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी  काळजी घ्यावी लागेल.

शरीरातील चरबीचा साठा वाढून वजन वाढते, ते खाणे जास्त व शरीरश्रम कमी या असतुंलनामुळे. हे असंतुलन बदलवले की वाढलेले वजन कमी व्हायला लागते.  केवळ आहार नियंत्रणाने थोडा काळपर्यंत वजन नियंत्रण शक्य होईल. कायम नियंत्रणासाठी मात्र व्यायाम करुन शरीराचे स्नायू वाढविणे आवश्यक असते. स्नायू वाढलेत की शरीरातील भट्टी जास्त जोरात जळते; म्हणजेच चयापचयाचा वेग (बीएमआर) वाढतो. त्यामुळे शरीरातील चरबी लवकर कमी होते. स्नायू वाढविण्यासाठी  व्यायाम आवश्यक आहे. अशा प्रकारे वजन नियंत्रणासाठी, व्यायाम व आहार नियंत्रण हे दोन्ही करायला हवे. 

चरबी वाढवणारे सर्वात महत्वाचे दोन अन्नघटक म्हणजे स्निग्ध पदार्थ व साखर. स्निग्ध पदार्थामध्ये  प्रति गॅ्रम ९ किलोकॅलरीज असतात. शिवाय श्रम करून कॅलरीज वापरल्या नाही, तर या खाल्लेल्या स्निग्ध पदार्थांची ९७% चरबी बनते. साखर किंवा (कर्बोदके) कार्बोहायड्रेट्समधे, प्रति ग्रॅम ४ किलोकॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी साखर व तेलतूपादि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवणे सर्वात महत्वाचे.  

डॉ. अविनाश सावजी 
अध्यक्ष, अमरावती जिल्हा योग असोसिएशन, व संचालक, प्रयास 
दंडे प्लॉटस्, राजापेठ, अमरावती. ४४४ ६०५
संपर्क : (०७२१) २५७३२५६, मोबा. ९४२०७ २२१०७) 

==================

Categories
Uncategorized

Saksham-Sevankur Camp, Akola 21-24 April 2011 – Report

Saksham-Sevankur Motivation Camp, Akola
21-24 April 2011-04-30

Brief Report
This is a brief report with some photos of Saksham-Sevankur Motivation camp, held at Akola, on 21-24 April 2011. This was the special Sevankur with focus on Differently able youths. This was a very special camp for every participant, resource person & organisers also. Everybody was so moved by the live stories of the differently able Heroes present in the camp as participant.

The camp was organised by the local Akola group of SAKSHAM which is working with visually impaired group since last few years. This group is led by Smt Manjushri Kulkarni, who is a core team member of Sevankur. Many of our Sevankur members are also involved in this activity since last 6 months.

In this 4 days residential camp, there were 32 blind, 5 hearing impaired, 12 physically challenged, 2 mentally challenged & 60 + normal youths & volunteers, from different parts of Maharashtra.

All the arrangements including the finances have been done by the local SAKSHAM group with contributions from many of the individuals of Akola.

There were resource persons who are themselves differently able & still had done something great.

1. Jaysing Chauhan, Nagpur – Physically challenged but a successful industrialist started from 200 Rs. & reached to 5 crore turnover company.
2. Tillu Tiwari, Akola- physically challenged, very good artist, self employed
3. Dinesh Rathi, Akola – lost his sight at the age of 29. But then became a successful businessman fighting all challenges.
4. Sarojtai Tole, Pune – Brail Publisher.
In addition to these external resource persons, this time some of the participants were interviewed, learn about their challenging life journey. These were the most moving sessions of the camp.

1. Kanchanmala Pande (Amravati) who is known as Golden Girl, 20 years old cheerful & energetic girl, secured 50 + gold medals in National/international events in swimming. She had represented India in commonwealth games at Millburn, Australia, then at Malaysia, Germany, Asian games 2010-China, Asian games 2011-Turkey. She had received Eklavya Award, Kridarantna award & many others.

2. Paneri Pasad (Amravati) 17 year girls with cerebral palsy, known as JALAPARI (Angel of Water). She secured 19 gold & 6 other medals in national swimming events till now. Even to stand on her feet or to walk few steps on ground is a great activity for her due to her physical disability. To speak few words is also an exercise for her. But she is having a very positive attitude towards life. She had given SSC exam this year & wants to learn more. She spoke few sentences with the participants, which was a very inspiring moments of the 4 days camp.

3. Saleem, 24 years for Kalyan, Mumbai, blind by birth is struggling without any family support. He had grown up & lived few years of his life on railway platform with all kinds of odds & bitterness, but had been able to keep smiling face always. He learned singing on Flute & now is known for that. He could earn his living with the help of his Flute. Now he had been able to get a life companion also.

4. Chetan Uchitkar (Washim) 6 years boy, blind by birth is nothing less than miracle. He is from a very marginal family background of a small village, without any learning facilities till now. But still he can tell 100 + stories on mike with full confidence. His GK is amazing, He knows all the GHOTALAs (scams) going on, many of the political & other happenings, he is very sharp in maths & can perform sums of two-three digits without pen & paper. He was the youngest resource person of the Sevankur camp.

There were many more stories to speak about.

One of the objectives of this special camp was to create more social support for these differently able youths & also to encourage them. But the level of motivation the normal participants got was tremendous. Instead of giving support to differently able youths, we felt that we need to take their support & inspiration to live with smiling faces in our life.

We have decided to integrate the differently able group in all the Sevankur camps henceforth.
Our immediate next Sevankur camps are proposed on May 27-28-29 at Aurangabad & in June (third or fourth week end) at Jalgaon/Dhule.

There are youth camps organised by different organisations. You may participate at suitable places. Some of them are
1. Sevankur at Aurangabad – 27-29 May
2. Sevankur at Jalgaon/ Dhule – 3 rd or 4 th week end
3. At Amalner, Dist Jalgaon – 26-31 may
4. At kolupur, Melghat, Dist. Amravati – 2-8 June

Categories
Uncategorized

The list of Role Models of SEVANKUR

We are fortunate to get the blessings of Baba & Sadhanatai Amte during our first annual meet at Anandwan in 2007. Other Amte’s like Dr. Bharatitai, Kaustubh, Pallavi, and Sheetal had also interacted with the participants.
The resource persons who shared & interacted on SEVANKUR platform & also are closely associated with are —–
1. Dr. Abhay Bang, SEARCH, Gadchiroli
2. Dr. Narendra Dabholkar, Pune
3. Venkat krsihnan (GiveIndia) Mumbai
4. Anshu Gupta (GOONJ) Delhi
5. Ramesh Kacholia, Nimesh Shah, Caring Friends, Mumbai
6. Dr. Girish Kulkarni (Snehalaya) Ahmadnagar
7. Aravind Chittewale, Madhu Chougaonkar, Nasik
8. Dr. Avinash Pol, Satara
9. Dr. Ashok Belkhode, Kinwat, Nanded
10. Dr. Ashish, Dr. Kavita Satav, MAHAN, Melghat, Amravati
11. Dr. Ashwinikumar Tupakari, Aurangabad
12. Nilima Mishra, BNVGN, Jalgaon
13. Yeshavant Limaye, Jnyan Prabodhini, Nigdi, Pune
14. Rambhau Ingole, VIMALASHRAM, Nagpur
15. Dr. Ulhas Jajoo, MGIMS, Sevagram, Wardha
16. Dr. Satish Gogulawar, Amhi Amchya Arogyasathi, Kurkheda, Gadchiroli
17. Dr. Premchand Pandit, Eye Surgeon, Shegaon, Buldana
18. Prabhakar Pusadkar, Wardha
19. Prasad Chikse, Jnyan Prabodhini,Ambajogai
20. Shashi Chaudhari, IT Entrepreneur, Nagpur
21. Suresh Khopade, Joint Police Commissioner, Mumbai
22. Sanjay Salunke, Pune
23. Bhupendra Mujumdar, Pune
24. Chhotu Varangaonkar, Amravati
25. Atul/ Sushama Sharma, Wardha
26. Indrajit Deshmukh, Pune
27. Dr. Dilip Peshve, VNIT, Nagpur
28. Karuna/Vasant Futane, SAMVAD, Rawala, Amravati
29. Subodh Kulkarni, Gadchiroli
30. Prof. Adv. Dr. Kishor Mahabal, Nagpur
31. Dr. Anil Patel, ENT Surgeon, Yavatmal
32. Subhash Tagare, Aurangabad
33. Prakash Dhobale, Nagpur
34. Dr. Avinash Saoji, PRAYAS, Amravati
35. Adv. Uday Warunjekar, High Court Pleader, Mumbai
36. Shri. Dinkar Gangal, GRANTHALI & Think Maharashtra.com, Mumbai
37. Dr. Vivek Kulkarni, Jnyan Prabodhini,Pune
38. Shri. Kaka Shitole, Amhi Sare Bapunche, Hadapsar, Pune
39. Shri. Bapu Potdar, Pune
40. Smt. Sudhatai Kothari, CHAITANYA, Rajgurunagar, Pune
41. Smt. Ulkatai Mahajan, Raigadh
42. Shri. Aadesh Bandekar, Mumbai
43. Dr. Ashvin Jojra, Jammu
44. Dr. Bhausaheb Ubale, Pune/Canada
45. Dhananjay Vaidya, Kolhapur
46. Smt. Rekhatai Chondhekar, Dep. Com. Sales Tax, Nagpur
47. Shri. Dadarao Khobragade, Nagbhid
48. Adv. Aparnatai Tamtirthkar, Solapur
49. Smt. Mayatai Sorate, Latur
50. Shri. Raju Shetti, Farmer’s Leader & Member of Parliament, Kolhapur
51. Dr. Dwarakaprasad Lohiya, Ambejogai
52. Dr. Shailatai Lohiya, Ambejogai
53. Shri. Radhesham Chandak, Founder Chairman, Buldana Urban Credit co.op. soc.
54. Shri. Satyapal Maharaj, Akola
55. Shri. Shankarrao Papalkar , Wazzar, Amravati
56. Shri. Ravi Bapatale, Founder, SEVALAYA, Latur
57. Dr. Gajanan Nare, Director, Prabhat Kids, Akola
58. Shri. Gajanan Janbhor, Akola – Chief Editor, Lokmat- Akola edition
59. Shri. Maheshwar Abhyankar, Akola
60. Smt. Manjushri Kulkarni, Akola
61. Shri. Sanjay Kamal Ashok, Swamini Vidhava Foundation, Akola
62. Shri. Rajesh Khawale, Res. District Collector, Wardha
63. Shri. Santosh Garaje, Sahara Parivar, Gevrai, Dist. Beed
64. Shri. Vivek Sawant, MD, Maharashtra Knowledge Corporation Ltd., Pune
65. Paromita Goswami, Activist & Founder of “Shramik Elgar”, Chandrapur
66. Shri. Ashok Chiwate, Progressive farmer, Satara
67. Dr. Sanjeev Saoji, Aurangabad
68. Shri. Ram Bhogale, NIRLEPgroup, Aurangabad
69. Shri. Rajesh Thombare, Chalisgaon, Dist. Jalgaon
70. Shri. Abhijeet Dharmadhikari, Aurangabad
71. Dr. K. B. Patil, Vice Chanceller, North Maharashtra University, Jalgaon
72. Dr. Milind Bhoi, Pune
73. Shri. Dhanajay Shedbale, Pune
74. Shri. Yajurvendra Mahajan, Deepstambh Pratishthan, Jalgaon
75. Shri. Venkat Iyer, Mumbai/Dahanu
76. Shri. Laxman Gole, Pune
77. Padmashri. Bhavarlalji Jain, Jalgaon
78.  

Coming Soon

Prayas Sevankur
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.