Category: Uncategorized

एक दिवस असाच भावेशबाजारात आपल्या ठेल्यावर मेणबत्या विकत होता. त्यादिवशी महाबळेश्वरलाहवापालट करण्यासाठी म्हणून काहीदिवस रहायला आलेलीनीता नामक युवती फिरत फिरत त्याच्या ठेल्याजवळ आली. एक अंध व्यक्ती मेणबत्त्या विकतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने भावेशबद्दल सविस्तर चौकशी केली. भावेशचाप्रामाणिकपणा, जिद्द पाहून तीप्रभावित झाली व दररोज त्याच्या कामात त्याला मदतकरायला म्हणून येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झालीव ते प्रेमातकधी पडले हे त्यांना कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचानिर्णय घेतला. एका अंधमेणबत्ती बनवून विकणाऱ्या गृहस्थाबरोबर, सर्व काहीव्यवस्थित असलेली नीता लग्नकरते म्हटल्यावर तिलाकुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकचहोते; पण नीताआपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या आईवडिलांना राजी केले. वर्षभरानंतर त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्यांनीमहाबळेश्वरलाच एका छोट्याशाघरात संसार थाटला. अन्न ज्या भांड्यांमध्ये शिजवायचे त्याचभांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेणवितळविले जायचे. कारण त्यासाठीवेगळी नवीन भांडीखरेदी करण्याची पणत्यांची परिस्थिती नव्हती. मात्र आता नीता सोबत आल्याने भावेशच्या कामाला चांगलीच गती आली व त्यांचा व्यवसाय वाढू लागला. हळूहळूदोघांनी कष्टातून एक दुचाकीवाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता नयेणारी नीता आतादुचाकी व पुढेचारचाकी वाहन पण चालवायलाशिकली.
भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्तीनिर्माते आणि संस्थांकडूनमार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणावा तास प्रतिसाद मिळालानाही. बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांनीही नकारदिला. भावेश नीतासोबतमॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्शकरून, त्यांचा आकारआणि बनावट समजूनघ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्तीबनविण्याचे कौशल्य त्याने हळूहळू आपल्या कल्पकतेने विकसितकरीत नेले. पुढेएका बँकेने त्याला१५ हजार रुपयेकर्ज दिले. त्यातूनत्यांनी कच्चा माल वसाचे खरेदी केलेव सनराइज कँडल हि कंपनी सुरुकेली. आज याकंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २५कोटी रुपयांपेक्षा जास्तझाला आहे. ५किलो मेणापासून सुरुवातकेलेल्या भावेशला आता दररोज १२५ क्विंटल मेणमेणबत्त्या बनविण्यासाठी लागते. मेणबत्ती बनविण्यामध्येस्वतःची कल्पकता व सृजनशीलतावापरून विविध प्रकारच आकर्षकसुगंधी व शोभनीयमेणबत्त्या ते बनवूलागले. हळूहळू त्यांच्या मेणबत्यांनागमाहक आवर्जून खरेदीकरू लागले. ठेल्यावरहोणारी विक्री पुढे दुचाकीव नंतर व्हॅनमधूनहोणे सुरु झाले.
आज जवळपास १००००विभिन्न प्रकारच्या मेणबत्त्या भावेशचीकंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारेबहुतेक सर्व कर्मचारीअंध आहेत. आतापर्यंतदेशभरातील २३०० अंधांनाभावेशच्या कंपनीच्या मार्फत प्रशिक्षणव रोजगार उपलब्धकरून देण्यात आलेलाआहे. एकूण ७०अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाभावेशच्या कंपनीमार्मत महाबळेश्वर येथेसध्या उभी करण्यातआलेली आहे. त्यांनाभोजन–निवास व्यवस्थेशिवाय त्यांना स्टायपेंड पण प्रशिक्षणकालावधीमधे दिलेजाते. आपापल्या गावीपरत गेल्यावर मेणबत्त्याबनविण्यासाठी आवश्यक ती मदत–मार्गदर्शन सुद्धा पुरविलेजाते.
अंध व्यक्तिना डोळे नसलेतरी अंत:चक्षूंनीते जग पाहूशकतात, हेभावेशने सिद्ध करून दाखवलेआहे. या व्यवसायानेभावेशचे नाव देशातच नव्हे तर जगाच्यापाठीवर पोहोचले आहे. भावेशनेमोठ्या कठीण परिस्थितीतसुरु केलेला व्यवसाययशस्वी करून दाखवलाआहे. आज रिलायन्सइंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणिरोटरी क्लब सारखेमोठे ब्रॅण्ड्स त्यांचेनियिमत गमाहक आहेत. आजसंपूर्ण देशभरात तसेच जगातील६० देशांमध्ये त्यांच्यामेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामातभावेशची पत्नी नीता हिचीखूपच मोलाची वमहत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीचीप्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतआहे. दृष्टीहीन तरुणांनास्वावलंबी बनविणे हे नीताआणि भावेश यांनीआपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानलेआहे व तेत्यासाठी सतत प्रयत्नरतआहेत.
भावेश गोंदियाला शाळा शिकतअसतांनाच त्याची दृष्टी कमीव्हायला लागली होती. मात्रभावेश लहानपणापासूनच धाडसीस्वभावाचा होता. सायकल चालविणे, आसपासच्या टेकड्या–डोंगर चढणे, मनापासून निसर्गाचा आनंद वआस्वाद घेणे हात्याचा स्वभाव होता. १९८८साली वयाच्या सतराव्यावर्षी अकरावीला असतांनात्याने ठरविले की राष्ट्रीयएकात्मता हा विषयघेवून गोंदिया तेकाठमांडू–नेपाळ अशी सायकलनेयात्रा करायची. त्याच्यासोबत पोलिओझाल्यामुळे पायांमध्ये ताकद नसणारात्याचा मित्र पम्मी मोदीव दिनेश पटेलहा डोळस मित्र पण तयार झाला. त्यांनी सायकलमध्ये काही बदलकरवून दोन पायडलव काही गिअर्सबसवून घेतले. पायवापरु न शकणारात्याचा मित्र पम्मी समोरबसून हँडल पकडायचा. भावेशला दिसत नसल्यामुळेतो मागे बसायचाव पायडल मारायचेकाम करायचा. अशीडबलसीट साकयल चालविण्यासाठी बराचकाळ त्यांनी सरावकेलेला. गोंदिया ते काठमांडूव परत अशी५६२० किमीची सायकलयात्रात्यांनी ४५ दिवसातपूर्ण केली. दिनेशपटेल हा डोळस मित्र पण दुसऱ्या सायकलवरत्यांच्यासोबत यात्रेमध्ये होता. यासायकल यात्रे दरम्यानभावेशच्या पुढील आयुष्यातील वाटचालीचीबरीचशी बीजे रुजल्यागेलीत. या जगामध्येचांगुलपणा सगळीकडे ठासून भरलेलाआहे, वाईट माणसांचीसंख्या ही चांगल्यांच्यातुलनेत खूपच कमीआहे हे तोशिकला. नाना प्रकारच्याअडचणींना सामोरे कसे जावे, आपल्या उद्दीष्टांसाठी पैशांची जुळवाजुळव कशीकरावी, लोकांचे सहकार्य कसे मिळवावे इ. शिकलेल्याअनेक गोष्टी पुढीलआयुष्यात त्याला उपयोगी पडल्यात.
१९९९ साली भावेशनेप्रथमच दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रिडास्पर्धेमध्ये वाच २८व्या वर्षी भागघेतला. सातारा जिल्हास्तरावरील यास्पर्धेमध्ये त्याने अनेक क्रिडाप्रकारांमध्येसहभाग नोंदवला वतेथून त्याच्या क्रिडा क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात झाली. आतार्पंयत थालीफेक, गोळाफेक वभालाफेक यामध्ये त्याने राज्यव राष्ट्रीय स्तरावरील११४ पदके प्राप्तकेलेली आहेत. नुकतीच त्याची२०२० साली टोकिओयेथे होणार्यापॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या देशातर्फे निवड झालेली आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्याचा त्याचासंकल्प असून त्यासाठीतयारी सुरू केलेलीआहे. एकीकडे आपल्यासनराईज कॅन्डल या कंपनीलाभरभराटीला घेवून जात असतांना, सोबतच त्याची यास्पर्धांसाठीची तयारी पण तेवढ्याचजोमाने सुरु आहे.
२००८ मध्ये वयाच्या चाळीशीमध्येते काश्मीरला श्रीनगर–सोनमर्ग–कारगिलला गेलेअसता, हिमालयाच्या शिखरांनीत्याला साद दिली. लहानपणी जवळपास डोंगरांवर चढण्याचाउद्योग भरपूर केलेला. आतावयाच्या चाळीशीनंतर पुन्हा मित्रांसोबतट्रेकिंग व गिर्यारोहणालासुरुवात केली. आतापर्यंत सह्याद्रीपर्वताचे सर्वात उंच शिखरकळसूबाई सहा वेळाचढून झाले. हिमालातीलकांगरा हे ६१२०मीटर उंचीचे शिखरपण काबीज झाले. आता पुढची चढाईही ६७५० मीटरउंचीच्या मीरा याशिखरावर होणार आहे. २०१९मध्ये जगातील सर्वातउंच शिखर माऊंटएव्हरेस्ट काबीज करण्याचा भावेशचासंकल्प आहे. त्यावेळीबहुधा तो माऊंटएव्हरेस्ट चढून जाणाराजगातील पहिला दृष्टीहिन व्यक्तीअसेल.
सन २०१९ चीमाऊंट एव्हरेस्ट मोहिमव २०२० मधीलटोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठीसुवर्णपदक या ध्येयासाठीभावेश स्वत:लातयार करतो आहे. त्यासाठी त्याचा दररोजमैदानावर कठोर परिश्रमव सराव सुरुअसतो. रोज ८–१० किमीधावणे, ५०० पुशअप्सव शारिरिक तंदुरुस्तीसाठीचीअन्य साधना त्याचीअव्याहतपणे सुरु आहे. पोलो मैदानावर धावण्याच्यासरावासाठी त्याची पत्नी नीता गाडीड्राईव्ह करते, गाडीला मागेएक १५ मुटाचादोर बांधलेला असतो, तो हातात धरुनभावेशने गाडीच्या मागे धावायचेअशी त्याची दररोजचीसर्कस सुरु असते. भावेश गमतीने सांगतोकी मला माझ्यापत्नीशी खूप सांभाळूनवागावे लागते. कारण एखादंदिवशी काही कमीअधिकझाले तर सकाळीधावतांना ती गाडीचावेग वाढवून देणचाधोका असतो !
मेणबत्या तयार करतांनाजे मेण वायाजायचे त्याचे कायकरावे हा मोठाप्रश्न त्यांच्यापुढे होता. कारण अशाप्रकारच्या वेस्टेज मेणाने गोदामेभरलेली होती. बऱ्याचविचारांती त्यांनी यापासूनपुन्हा नविन मेणबत्यातयार करायला घेतल्यात. पण त्यामध्ये विविधप्रकारचे रंग वप्रकार असल्याने व तेसगळे एकत्र मिसळल्यागेल्याने त्यापासून बनविलेल्या मेणबत्यादिसायला चांगल्या नव्हत्या. पुन्हाविचार–चिंतन सुरुझाले. शेवटी त्यामध्येकाळा रंग मिसळूनसंपूर्ण काळ्या रंगाच्या मेणबत्त्यातयार करण्यात आल्यातव त्या विक्रीसाठीदुकानांमध्ये पाठविल्यात. बरेच दिवसझालेत तरी त्यातशाच पडून होत्या. काळ्या रंगामुळे त्यांना ग्राहकच मिळेना. पुन्हा भावेशची चौकटीबाहेरविचार करण्याची सवयकामी आली. त्यानेअसा प्रचार करणेसुरू केले कीया काळ्या रंगाच्यामेणबत्त्या वातावरणातील सर्व नकारात्मकगोष्टींना दूर ठेवतात! आणि झाले ! ज्यामेणबत्त्यांना एकही ग्राहक घेत नव्हता, त्यामेणबत्त्यांना इतकी मागणीआली की पुढलेकाही महिने त्यांनाबाकी सर्व कामेबंद ठेवून, केवळवेस्टेजमधूनच नाही, तर नविनमेणापासून फक्त काळ्यारंगाच्याच मेणबत्त्या बनवाव्या लागल्यात.

संपर्क :
Aspire- The Institute of Human Development Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola
Office: 8275726017/16
Email: sachinburghate@gmail.com
URL: www.aspire.ihd.com
Dr. Avinash Saoji, Director PRAYAS, Amravati : Speech given in a 2 days NGOs Capacity Building Workshop at MIT Pune. He had given tips regarding the crucial issue of Fund Raising for NGOs & also about social entrepreneurship.



असाही डॉक्टर…… डॉ अनिल पटेल, यवतमाळ

आतापर्यंत त्यांच्याकडे येऊन गेलेल्या ५ लक्ष रुग्णाचे हाताने लिहिलेले रेकॉर्ड उपलब्ध आहे. कितीही वर्षे आधी रुग्ण आलेला असला तरी नाव-गाव सांगितले कि ते रेकॉर्ड ५ मिनिटातच सापडते व त्यामध्येच नवीन तपशील लिहिला जातो.
त्यांचा सल्ला हा केवळ कान नाक घश्याच्या तक्रारीपुरता मर्यादित नसतो तर, रुग्णाच्या आहार-व्यायाम-व्यसनादि सवयीपर्यंत व प्रसंगी कौटुंबिक प्रश्नांपर्यंत असतो. त्यामुळे त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आलेत. अनेक रुग्णांचे तर ते फॅमिली डॉक्टर व सल्लागारच झालेलेआहेत
अनुभवांती त्यांनी औषधे व ऑपरेशन्सचे प्रमाण कमी करत आणले व बरेचसे आजार हे साध्या बिनपैशाच्या उपायांनी बरे होतात म्हणून चुकीच्या सवयी बदलून व्यायाम-आहारादी आरोग्यदायी सवयी, योग्य सल्ला व मार्गदर्शन यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे खूपसे रुग्ण, त्यांच्या सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात.
खरेतर त्यांचा यवतमाळशी कसलाही संबंध नव्हता. त्यांचे सर्व बालपण-शिक्षण-पश्चिम महाराष्ट्रात झालेले. इकडे ना त्यांचे कोणी नातेवाईक, ना काहीही संपर्क. सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यावर पुढील शिक्षण व अनुभव मुंबई-पुणे येथे घेतल्यावर त्यांनी विदेशात जाऊन भरपूर पैसा व अन्य सर्व भौतिक सुखसोयी मिळण्याच्या सर्व संधी असताना आपल्या गुरूंच्या “जेथे गरज आहे तेथे जावे” या सल्ल्यानुसार शोध घेत असता यवतमाळला येऊन पोहचले व १९८० मध्ये स्वतःचा खाजगी दवाखाना सुरु केला. त्यावेळी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकही इएनटीतज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना वर्धा किंवा नागपूरला जावे लागत असे. त्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय होई. त्यामुळे अनेकजण उपचार घेत नसत. गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी त्यांनी सरकारी रूग्णालयात मानसेवी काम मागून घेतले, गेली ३७ वर्षे बरेचदा मोफत वा अतिशय कमी फी घेऊन हजारो रूग्णांना त्यांनी बरे केले.
त्याकाळात त्यांनी परिसरातील खेड्यापाड्यामध्ये रुग्णतपासणीसाठी जायला सुरुवात केलेली, जी आज तागायत ३७ वर्षांनंतरही सुरूच आहे. प्रारंभीच्या काळात एसटीने, नंतर स्कुटरने १५० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात ते जात असत. पुढे चारचाकी वाहन आल्यावर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला लागलेत. आतातर निमंत्रण नुसार त्यांची शिबिरे इतर ९ राज्यांमध्ये पण झालेली आहेत. गेली अनेक वर्षे तर आठवड्यातील सातहि दिवस त्यांची शिबिरे ठरलेल्या वेळापत्रका नुसार सुरु असतात. पुढील ३ महिन्याचे वेळापत्रक त्यांच्या ओपीडीमध्ये लागलेले असते. त्यामध्ये कसल्याही कारणासाठी बदल होत नाही. याबाबतचा क्रम हा साप्ताहिक, १५ दिवसांनी वा एक महिन्यांनी असा गरजेनुसार त्या-त्या गावात ठरलेला असतो. आतापर्यंत शिबिरासाठीचा त्याचा प्रवासच हा १०-१२ लक्ष किमीपेक्षाही जास्त झालेला असावा.
वेळेच्या संदर्भात ते अतिशय काटेकोर आहेत. दवाखाना, घर, सामाजिक जबाबदाऱ्या, छंद या सर्वांचे अतिशय सुंदर नियोजन ते करत आलेले. त्यामुळे मुलगा लहान असताना ते त्याला दहाव्या वर्गापर्यंत ट्युशन न लावता स्वतः शिकविण्यासाठी वेळ काढू शकलेत. कुटुंबियांसोबत वर्षातून एकदोनदा सहल-सुटीचा आनंद, बाबा आमटे, ठाकूरदासजी बंग या ज्येष्ठांपासून तो डॉ. रवी कोल्हे, वसंत करुणा फुटाणे व इतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक स्नेह-संबंध, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाणे-येणे, त्यांच्या विषयातील होणाऱ्या कॉन्फरन्सेस या सर्वच भूमिकांना ते न्याय देऊ शकलेत. एवढेच नव्हे तर अतिशय नियमितपणे वाचन, व्यायाम, गाणी ऐकणे इ. अनेक वैयक्तिक बाबींचा पण अतिशय काटेकोरपणे वेळ काढत आलेत. जीवनाच्या जवळ जवळ सर्वच भूमिका वेळेचे इतके सुंदर नियोजन करून संतुलित अवस्थेत जगण्याचा मनापासून आस्वाद व आनंदघेणाऱ्या डॉ. अनिल पटेलांसारख्या व्यक्ती अभावानेच दिसतात.
त्यांच्या आयुष्यावर अनेकांचा प्रभाव राहिलेला आहे. व्यक्ती लहान असो, मोठी असो, जे आवडले-पटले ते त्यांनी आपल्या जगण्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींचा सिनेमा त्यांनी पाहिला, पुस्तके वाचलीत व त्यांच्या आयुष्यात साधेपणा व इतर मूल्ये दृढ झालीत बाबा आमटे, डॉ रवी कोल्हे व इतर अनेकांकडून असेच काहीतरी ते घेत गेलेत. राजीव दीक्षित, ओशो यांचा पण बराच प्रभाव त्यांच्यावर झालेला. मात्र एवढे असूनसुद्धा कुठल्याच टोकाला न जाता व कोणत्याच चौकटीत स्वतःला बांधून न घेण्याचे पथ्य मात्र त्यांनी सांभाळले.
त्यांनी झोप कमी करण्याचा प्रयोग केला. ती कमीकमी करत त्यांनी आता ४ तासांवर आणलेली आहे. रोज रात्री ते ११ वाजता झोपतात व सकाळी साडेतीनला उठतात. दिवसभर कुठल्याही विश्रांती शिवाय ते कार्यरत असतात.

१९८३ साली नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवी घेतांनाच, आयुष्यात काय करायचे नाही हा निर्णय माझा झालेला होता. नोकरी करायची नाही, स्वत:चा दवाखाना थाटायचा नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्यासाठी न करता समाजातील गरजू लोकांसाठी करायचा. खूप जास्त शिकून काही ठराविक लोकांसाठी काम करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी काही करता आले तर करायचे, हे नक्की झाल्याने अनेक विषयांमध्ये एमडी/एमएस ला सहज प्रवेश मिळत असतांना पण पुढे शिकायचे नाही हे ठरविले.
कॅन्सरशी मैत्री करू या !
एकूणच यासंदर्भात वैज्ञानिक माहिती व मानसिक आधार यांची असलेली आवश्यकता व त्यामुळे होत असणारे सकारात्मक परिणाम वरील उदाहरणावरून लक्षात येतात. त्यामुळे याप्रकारच्या आजारांमध्ये तुमच्या परिचितांपैकी कोणाला माझी काही मदत होवू शकत असल्यास मला आनंदच होईल. निसंकोच माझ्याशी संपर्क करावा.