Categories
Uncategorized

Reflection on the eve of completing 51 years of my life

Reflection on completing my 51 years of life
I am completing 51 years of my life on tomorrow (7 th May) this year. I have already decided to live for a total of 100 meaningful years. So now I have only 49 years remaining & there are lot many things to do, before I depart from this world. I have started this kind of “countdown” from my last birthday only. It helped me in becoming more focused & choosy regarding utilizing my time for meaningful activities. Now I don’t want to waste time for smaller & meaningless things. I became more affirmative, assertive because of this changed way of looking towards my own life. My communication became more effective & impactful. I am enjoying & experiencing more life, joy, satisfaction & contentedness in my living. I am feeling more energetic with good physical & mental stamina. All this could happen only because of the grace of God & well wishes of friends like you. Keeping my last day of my life in the background of my daily routine, like the antivirus program working in our computers also helped a lot. 

Now I want to invite you to think & reflect back like this & experience the joy & meaningfulness of life like me. GIVING is a very simple way of experiencing it. As a friend & well wisher of you, I want you to start doing something about GIVING in your life. It could be in form of money, time, love & affection, skills and or any other form. You can find out someone/something where your GIVING can make a significant change in someone’s life.

One way of doing it by contributing to various PRAYAS-Sevankur activities. The recurring expenses of Prayas-Sevankur are around 15 Lakhs Rs. this year. In addition to this we need to start & complete our own building “Prayas-Sevankur Bhavan” of 9500 sq. feet at Farshi Stop, Amravati. It will cost around 100 Lakhs Rs. It will be the homely training centre (actually a recharging station) for the children, youths and all others.

I expect from you a monthly or yearly voluntary donation for PRAYAS-Sevankur, as my birthday gift along with your well wishes. It will help me in concentrating on the real content of my work & not on thinking & collecting the funds, to run the activities.

The monthly / yearly contribution could be any amount you think you could give. You can give it by giving standing instructions to your bank to transfer the amount to the bank account of PRAYAS (details given below) every month or year on a specific day of the month or the year. Another way could be you can give it to our collection volunteers. (You yourself can become such a collection volunteer for minimum of 10 contributors.) You also can ask & motivate your other family members & friends to start GIVING this way.

In addition to the monthly / yearly contribution, one time donation for the “Building Fund” is also needed & expected.        

Donations should be made by cash/ account payee Cheque or DD drawn in favor of
 (You can directly deposit it in our following Bank accounts also)
1. “PRAYAS” Union Bank of India, Saving Bank Account no. 323302010064340 (Amravati Branch- IFSC – UBIN0532339)
2. “PRAYAS Chandur Bazar” State Bank of India, Saving Bank Account no.11590669883 (Chandur Bazar branch, Dist. Amravati. IFSC- SBIN0002147)
3.  “PRAYAS Chandur Bazar” ICICI Bank, Saving Bank Account no.042801001011 Amravati branch, Dist. Amravati.
 Donations to PRAYAS are entitled to 50% tax exemption u/s 80G of Income Tax Act.
PRAYAS is having FCRA Registration & can accept foreign donations also. (FCRA Reg. No. 083730013 / dated 02.09.1998)

Categories
Uncategorized

Intro video of “Sevankur Little Champs” program by Dr Avinash Saoji at Jalgaon, which is highly inspirational & appreciated by thousands of spectators at Jalgaon, Nagpur, Wardha, Amravati & Yavatmal. Some selected challenged children share their life story & the struggle they faced for their outstanding achievements.



One of “Sevankur Little Champs” Suyash Khandekar being introduced by Dr Avinash Saoji.



One of the “Sevankur Little Champs” narrating his story of struggle & victory.

Categories
Uncategorized

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू उभे करून सर्व समाजाला जगण्याची ताकद देणारा हृदयस्पर्शी उपक्रम

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ डोळ्यांमध्ये अश्रू व मनामध्ये जिद्द निर्माण करून  
अर्थपूर्ण  ज गण्यासाठी ताकद देणारा प्रेरणादायी व हृदयस्पर्शी उपक्रम  

प्रिय मित्रांनो !

सर्व काही व्यवस्थित असून, हातपाय, कानडोळे धडधाकट असूनही, आम्ही आयुष्यात सारखं रडगाणं गात असतो. थोड्या थोड्या अपयशाने खचून जातो, नाही नाही ते नकारात्मक विचार मनात दाटून येतात, स्वत:चेच दु:ख असह्य व भारी वाटायला लागते. एकूणच जगण्यामधील आनंद व उत्साहाचा झरा आटून जातो. अशावेळी गरज असते ती सकारात्मक दृष्टीकोन जोपासून, मार्गात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून काहीतरी मिळवून दाखविणार्‍या जित्याजागत्या आदर्शांची.

असेच काही आयडॉल्स् एकाच मंचावरुन लोकांच्या समोर ठेवणारा प्रयासचा ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा नविन उपक्रम. अतिशय आगळ्यावेगळ्या व प्रेरणादायी सिध्द झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना कसं घडवावं, त्यासाठी काय करावं यासाठी चिंतेत असलेल्या पालकांना, आयुष्यात वेगळं काही करू पाहणार्‍या तरुणांना, थोड्या-थोड्या अपयशाने निराश होणार्‍या, खचून जाणार्‍या, भरकटलेल्या, जीवनाचा सूर हरवून बसलेल्या, प्रसंगी आत्महत्येचा विचार मनात येणार्‍या अशा सर्वांना, सकारात्मक दृष्टीकोन व जगण्याची प्रेरणा व एक नवी दिशा व आशा मिळाल्याचा अनुभव नुकत्याच जळगाव, नागपूर व वर्धा येथे झालेल्या ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या कार्यक्रमातून दिसून आले.

   
‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ च्या मंचावरून ज्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, संघर्ष आहेत, अडथळे आहेत, तरीही त्यांनी हार न मानता अथक प्रयत्नांनी काहीतरी मिळवून दाखविलेले आहे अशी काही मुले आयडॉल म्हणून लोकांपुढे आलीत. कोणी अंध, कोणी शरीराने विकलांग, कोणी एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त,  तर कोणी घरच्या गरीबीशी झुंज देत शिक्षण घेत असणारे. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती व ती म्हणजे जगण्याचा आनंद व उत्साह. समर्थपणे जीवनाशी लढणारी, परिस्थितीविषयी कोणतीही कूरबूर न करता जगायचं कशासाठी व कशारितीने हे ठामपणे सांगणारी भन्नाट ताकदीची ही आगळीवेगळी मुलं. मंचावरून या एकेकाला प्रत्यक्ष पाहून, त्यांची जीवनकहाणी ऐकूनच, त्यांचे अनुभव, जिद्द समजून घेवून अनेकांची आयुष्य बदलतांना दिसलीत.

प्रयास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक व सेवांकुर या तरुणांसाठीच्या खुल्या मंचाचे प्रेरक असलेले अमरावतीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व हजारोंना आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत-मार्गदर्शन करणारे डॉ. अविनाश सावजी यांच्या सातत्यपूर्ण कामामधून व चिंतनातून हा अतिशय प्रेरणादायी व उपस्थितांची हृदये हेलावून सोडणारा उपक्रम साकार झालाय. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ कार्यक्रमात ते स्वत: मंचावर या मुलांशी संवाद साधून त्यांना बोलतं करतात, त्यांच्या कणखर जगण्याची कहाणी सर्वांसमोर उलगडून दाखवितात. यासोबतच ते त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या वाटेने केलेच्या जीवनप्रवासातून, त्यांना स्वत:च्या स्वधर्माचा शोध कसा लागला, गेल्या २८ वर्षांच्या प्रदिर्घ अभ्यास व सामाजिक कार्याच्या अनुभवांद्वारे अर्थपूर्ण जीवन का व कशासाठी जगायचे, यश कसे मिळवावे, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्व विकास इ. अनेक विषयांवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात. त्यांची करुणा व तळमळ, त्यांच्या शब्दाशब्दांमधून पाझरते व सर्व उपस्थितांच्या हृदयांना चिंब भिजवून, डोळ्यांमधील अश्रूंद्वारा ती मुक्तपणाने वहायला लागते. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सर्व प्रेक्षक/श्रोत्यांना एका वेगळ्याच उंचीवर त्यांच्यासोबतच घेवून विहरतात.  

‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ या उपक्रमाची काही वैशिष्ट्ये 

१. २२ जानेवारी २०१२ ला पहिला कार्यक्रम जळगाव येथे झाला व त्यानंतर १२ व १९ फेब्रुवारीला  तो नागपूर व वर्धा येथे झाला. अशाप्रकारे एका महिन्याच्या कालावधीतच तीन वेगवेगळ्या शहरात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

२. जळगाव व नागपूर येथे ३५००-४०००, तर वर्धा येथे २५०० प्रेक्षक-श्रोत्यांची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभली होती. आणि हे सर्व आयोजन करणार्‍या प्रयास संस्थेमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची संख्या फक्त चार असतांना. याचाच अर्थ प्रयास-सेवांकुरचे या सर्व ठिकाणी स्वयंसेवक/पाठीराखे यांचे नेटवर्क व त्यांची बांधिलकी किती प्रचंड असणार हे लक्षात येते.

३. कोणी क्रिकेटवीर नाही, कोणी सिनेनट नाही, कोणी राजकारणी नाही, त्या अर्थाने कोणीही सेलिब्रीटी  नाही, मंचावर येणारा एकही चेहरा ओळखीचा नाही, नृत्य-गायन वा अन्य कसल्याही प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तरी एवढ्या मोठ्या संख्येने तीनही शहरांमध्ये कार्यक्रमासाठी लोक आलेत हे एक आश्‍चर्यच मानायला पाहिजे. या कार्यक्रमांचे नियोजन/आयोजन केवळ ५ ते १० दिवसांच्या कालावधीत करण्यात आले होते हे आणखी एक आश्‍चर्य.

४. आज सिनेमा थिएटरमध्येही लोक एका जागेवर दोन तासांसाठीही बसत नाही, या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमासाठी आलेले लोक मात्र साडेतीन-चार तास झालेत तरी जावू इच्छित नाहीत, ही या उपक्रमाची ताकद दिसून आली. केवळ एक चक्कर मारुन निघून जावू वा १० मिनिटे बसू व निघून जावू हे ठरवून आलेले बहुतेक लोक संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय तर स्वत: जात नाहीतच, उलट फोन करुन घरी राहिलेल्यांना व इतर मित्रांना आग्रहपूर्वक कार्यक्रम बघण्यासाठी तातडीने बोलावून घेतात हे कशाचे द्योतक आहे ?
५. प्रत्येक कार्यक्रमाचा एक विशिष्ट श्रोता/प्रेक्षक वर्ग असतो. मुलांच्या कार्यक्रमामध्ये मोठे फार रमत नाहीत, तर मोठ्यांच्या कार्यक्रमात मुले कंटाळतात. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा एक असा कार्यक्रम ठरला की घरातील तीनही पिढ्यांना जो सारखाच भावतो व त्यामुळे मुले, त्यांचे पालक व आजी-आजोबा अशा तीनही पिढ्यांना त्यामधून स्वत:साठी काहीतरी मिळते.
६. तीनही ठिकाणी अशा प्रकारची अनेक स्थानिक लढणारी कणखर मुले शोधता आलीत व त्यांना पण मंचावर सर्वांच्या पुढे सादर करता आले. त्यामुळे अशी मुले काही फक्त मंचावर आलीत तीच आहेत असे नव्हे, तर आपल्याही शहरात, गावात, गल्लीत, शेजारी पण असे आदर्श असू शकतात व त्यांचा शोध घेण्याची दृष्टी या कार्यक्रमाद्वारे सर्व उपस्थितांना लाभते हे लक्षात आले.
७. मंचावर कोण मुले लोकांपुढे आलीत हे पण फारसे महत्वाचे नसल्याचे अनुभवास आले. जगण्यात संघर्ष, त्यावर मात करुन काहीतरी मिळविले आहे व हे सर्व जीवनमूल्यांना जपून, ही त्रिसूत्री ज्यांच्या आयुष्यात आहे अशी कोणीही ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ म्हणून लोकांना तेवढीच भावतात असे दिसून आले.
८. मंचावर सादर होणार्‍या मुलांसाठी तर हा कार्यक्रम त्यांच्या असलेल्या आजारासाठी, त्यांच्या विकलांगतेसाठी, समस्येसाठी एक थेरेपी ठरतो. उदा. पाणेरी या मुलीच्या बोलणे, हस्ताक्षर, स्नायूंची शक्ती व हालचालींमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. राणी या मुलीला अद्याप एचआयव्हीसाठी एआरटी औषधोपचार सुरु करण्याची गरज भासलेली नाही.
९. मंचावरील मुलांप्रमाणेच समोर बसलेल्या शरीराने धडधाकट असणार्‍या व सर्व काही व्यवस्थित असूनही मनाने अपंग असणार्‍या सर्वांसाठी पण ही एक थेरेपी ठरते असे दिसून आले. अनेकांनी आमची निराशा दूर झाली, तणाव कमी झालाय, आमची समस्या ही आता फारच किरकोळ वाटायला लागली असे सांगितलेय. एकूणच समाजाच्या सर्वच थरात पसरलेल्या सामूहिक निराशा व नकारात्मक विचारांसाठी ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हा कार्यक्रम एक मास थेरेपी म्हणून उपयोगी पडत असल्याचे दिसून येते.
१०. मंचावरुन लोकांपुढे आलेल्या मुलांना मदत करण्यासाठी प्रेक्षक/श्रोत्यांमधून कोणीतरी लगेच स्वत:हून समोर येतांना सगळीकडेच दिसून आले. उदा. सुयश या मुलाच्या पुढच्या सर्व शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उपस्थितांपैकी बीडच्या एका प्रेक्षकांनी उचलली. जळगावच्या तेजस या अतिशय गोड गळा असणार्‍या अंध मुलाला संगीत शिकविण्यासाठी जळगावचेच एक संगीत शिक्षक समोर आलेत. याप्रकारे काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणार्‍यांना पण या कार्यक्रमातून एक रस्ता मिळतोय असे दिसते.
११. तीनही ठिकाणच्या कार्यक्रमांची जी दखल ज्याप्रकारे सर्वच वृत्तपत्रांनी घेतली तो पण एक सुखद आश्‍चर्याचा धक्का होता. सगळीकडेच कार्यक्रमाच्या बातम्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांमध्ये, जवळपास संपूर्ण पाव ते अर्धा पेज छापून आल्यात. बातम्यांचे मथळेच अतिशय वेधक होते. ‘सेवांकूर लिटील चॅम्प्सनी जळगावकरांना जिंकले, सकारात्मक विचारांचे धडे दिलेत, जगण्यची एक नवी दिशा दिली, सेवांकुर लिटील चॅम्प्स् देवदूताच्या स्वरुपात नागपूरात अवतरलेत, त्यांनी सर्वांना रडविले, वर्धेकर गहिवरलेत असे होते. या बातम्या वाचूनच अंगावर शहारे येतात व डोळ्यांमध्ये अश्रू अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित नसणार्‍या अनेकांनी दिल्यात.
१२. अगदी व्यावसायिक प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाला सुध्दा या पातळीचा प्रतिसाद, गर्दी, प्रसिध्दी व परिणामकारकता पहिल्याच प्रयोगापासून मिळाल्याचे ऐकिवात नाही. सर्वच दृष्टीने नितातं सुंदर व हृदयस्पर्शी ठरलेल्या या उपक्रमाला सर्व महाराष्ट्रात व देशातसुध्दा घेवून जाण्याचा संकल्प ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ चे जनक डॉ. अविनाश सावजी यांनी केलेला आहे.
१३. या कार्यक्रमाला अल्पावधीतच हे जे यश व उंची प्राप्त झालेली आहे, त्यामागे मंचावर येणारे लिटील चॅम्प्स् तर आहेतच. पण त्याचबरोबर डॉ. अविनाश सावजी यांचे अतिशय अर्थपूर्ण व हृदयाला हात घालणारे निवेदन, त्यांची तळमळ, त्यांची गेल्या २८ वर्षांची निस्वार्थ व निरपेक्ष समाजसेवेची साधना, वागण्या-बोलण्यातील सहजता, जगण्यातील साधेपणा, शब्दाशब्दांमधून प्रगट होणारे निगर्वी व अनाग्राही परंतु ठाम व्यक्तिमत्व, सर्वच वयोगटातील व विविध सामाजिक स्तरातील लोकांसोबत त्यांच्याच भाषेत सुसंवाद साधण्याचे कौशल्य या पण बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यांच्या उस्फुर्त व अतिशय अनौपचारिक निवेदनातून प्रत्येकालाच काहीतरी नविन जीवनोपयोगी सूत्रे मिळतात. दरवेळी त्यामध्ये नाविण्य सुध्दा असते.
१४. ‘सेवांकुर लिटल चॅम्पस्’ हे डॉ. अविनाश सावजी यांच्या प्रयास-सेवांकुरच्या प्रयोगशाळेत शोधल्या गेलेले एक अगदी कोरे करकरीत साधन. अनेकांची आयुष्य बदलविण्याचे सामर्थ्य असलेले, एक प्रचंड ताकदीचे हत्यार पेलण्यासाठी, तेवढेच सामर्थ्यशाली असलेले डॉ. अविनाश सावजी यांचे व्यक्तिमत्व व सेवांकुर लिटील चॅम्प्स् च्या स्वरुपात समोर आलेली दुर्दम्य इच्छाशक्ती व  प्रचंड ताकदीची मुले. लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोहचविण्यासाठी आपण संपर्क करु शकता.
१५. एप्रिल महिन्यात हाच कार्यक्रम अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे दि. २१, २२ व २३ तारखांना होत आहे. आपल्या शहरात असा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयास अमरावती येथे संपर्क करा.
Categories
Little Champs motivation Positive Attitude Sevankur Wardha

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

2500 audience, 3.5 hours long, highly inspiring-heart touching, “Sevankur Little Champs” at Wardha on 19 Feb. 
Read in Loksatta 

लिटल चॅम्प्सनी दिली जगण्याची नवी उमेद!

Categories
Uncategorized

यशाची मूलभूत साधने

यशाची मूलभूत साधने
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी व समर्थपणे सर्व आव्हाने पेलण्यासाठी, आम्हाला आमची कौशल्ये, क्षमता व गुणांचे संवर्धन करावे लागणार. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने स्वत:चे निरीक्षण करणे, गरजेनुसार स्वत:च्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर, विविध प्रयोग करुन, आवश्यक ते परिवर्तन करणे ही आवश्यक असेल. स्वत:मध्ये असणार्‍या कौशल्ये, क्षमता व गुणांचा शोध घेणे व त्यामध्ये सतत भर घालण्यासाठी प्रयत्न करत राहणे महत्वाचे असेल. हे सर्व शिकण्यासाठी व प्रत्यक्ष कृतिमध्ये आणण्यासाठी, अशा काही चाकोरी सोडून जगणार्‍या यशस्वी व्यक्तिमत्वांचा सहवास व त्यांच्या अनुभवांचे शेअरींग खूपच उपयोगी व मार्गदर्शक ठरु शकेल. काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍यांसाठी तर हे नक्कीच दिशादिग्दर्शक ठरु शकेल.
विज्ञान हे आमच्या दैनंदिन जगण्यामध्ये येणे, आमच्या प्रत्येक विचार व आचारामध्ये येणे म्हणजे खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. याप्रकारे विज्ञाननिष्ठ होता आलं तर आमचे जीवन हे बदलणारच. त्यासाठी स्वत:च्या आयुष्यात प्रयोग करत राहणे मात्र गरजेचे आहे. आम्ही अशाप्रकारे स्वत:ला कधी तपासलेले नसते. त्यामुळे स्वत:ला स्वत:ची ओळखसुध्दा फारच अपुरी असते. त्यामुळे स्वत:ला खर्‍या अर्थाने ओळखणे, स्वत:चा शोध घेणे, अशा प्रकारे सुरुवात करता येऊ शकते.
त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घ्यायला पाहिजे. या जगामध्ये राहणार्‍या सातशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसेसुध्दा सारखे नसतात. मग जर आमचा प्रत्येकाचा अंगठ्याचा ठसासुध्दा सारखा नाही, याचाच अर्थ माझ्यामध्ये नक्कीच असे काहीतरी वेगळे आहे, जे या संपूर्ण जगामध्ये फक्त माझ्यामध्येच आहे व इतर कोणाहीमध्ये ते नाही, याचा शोध लागला तर कायम स्पर्धा करण्याची गरज राहणार नाही. दुसर्‍या बाजूने आमच्यामध्ये एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्यामध्ये काहीतरी समान आहे. या समानतत्वाचा शोध लागल्यास प्रत्येकाशी माझे नाते जडेल. अशाप्रकारे या दोन अंगांनी स्वत:चा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतो. असा शोध घेणे हाच माणसाचा जगण्याचा हेतू असावा. असा शोध घेणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेवू शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोलीसुध्दा आपोआपच वाढेल. आनंद व खर्‍या अर्थाने मस्तीमध्ये प्रत्येक क्षण जगते येईल.
मला काहीतरी नविन शिकायचे आहे वा माझ्यकडे असलेले काहीतरी मला द्यायचे आहे, ही वृत्ती आम्हाला जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करते. सामान्य व असामान्य किंवा यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो. जसा एखादा मूर्तिकार छन्नी-हातोडा घेवून मूर्ती कोरतांना दगडावर घाव घालत असतो. १०-२०-५० घाव लागोपाठ मारूनही जेंव्हा दगड फुटत नाही तेंव्हा त्याला जर वाटले की ५० वेळा घाव घालूनही दगड फुटला नाही याचाच अर्थ पुढचे ५० घावही दगड फुटणार नाही आणि त्याने प्रयत्न करणे सोडून दिले तर तो अयशस्वी ठरतो. यशस्वी व्यक्ती प्रयत्न सोडत नाही व बरेचदा तो दगड ५१ व्या घावातच फुटतो. म्हणजेच यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये ५० घावांचे अंतर नसते, तर बरेचदा केवळ एकाच घावाचे अंतर असते. आपल्यापैकी अनेक लोक यशप्राप्तीसाठी प्रयत्न करून ही अयशस्वी झालो असू तर यशापासून आपण काही पावलेच दूर होतो हे विसरू नका व प्रयत्न सोडू नका. यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ टाकल्याशिवाय राहणार नाही.
शरीर, बुद्धी, मन व वेळ आणि पैसा ही यशप्राप्तीची मूलभूत साधने आपण कशी वापरतो यावर आपलं भविष्य अवलंबून असते. एखाद्या कारागिराला जशी आपली हत्यारे नेहमी धारदार ठेवावी लागतात व काळजीपूर्वक वापरावी लागतात, तशीच आपणही ही पाच हत्यारे कायम धारदार कशी राहतील व त्यांचा योग्य तो वापर कसा करायचा याचा विचार करावा लागेल व यावरच आपलं भविष्य व भवितव्य अवलंबून असेल.

माणसाचं आयुष्य तो किती वर्ष जगला यावर नाही तर, किती अविस्मरणीय क्षण जगला यावरून मोजायचे असते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून तर आपण शिकतच असतो. खरी कसोटी तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून शिकण्यात असते. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्या नजरेने पहायला शिकणे ही खरी दृष्टी असेल. यालाच गुणग्राहकता असेही म्हणतात. ही सर्वांकडून शिकण्याची वृत्ती कायम राखणे आम्हाला समृध्द बनवित असते. ‘‘ज्या लोकांना कशासाठी जगायच हे माहिती असते, ते कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतात. ज्यांना हे माहिती नसते ते लोक आयुष्यभर कसं जगायचं याच चक्रात अडकलेले असतात.’’ मी कशासाठी जगतो आहे, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, हे जर मला नाही कळले तर आयुष्य नुसतेच खाण्यापिण्यात व निरर्थक गोष्टी करण्यात वाया जाईल. आयुष्य हे एकदाच मिळते व ते अमूल्य आहे. मग ते केवळ पैशांसाठी एक्सेंज करणे हा मूर्खपणा असेल. त्याहून मोठे काहीतरी आयुष्यात करायचे आहे, ते काय असेल ते तुमच्यासाठी तुम्हालाच ठरवायचं आहे.
(यशस्वी व्हा या मी लिहिलेल्या पुस्तकामधून घेतलेला लेख) 

Categories
Uncategorized

माझा शैक्षणिक प्रवास

माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी …….
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)
Categories
Ageing camp Diet Fittnesss Life Style motivation Nutrition Obesity Positive Health Sevankur Weight Loss Weight Management Yoga youth Zero oil recipes

उपाशी न राहता वजन कमी करा. काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या

उपाशी न राहता वजन कमी करा. 

काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या 
१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले     तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.
२. चव समजणार्‍या ग्रंथी जीभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जीभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जीभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जीभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसण खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय ! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.
३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणार्‍या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.
४. जेवण करतांना रोज हॉटेलमध्ये बसून जेवण घेतो आहोत असे समजून जेवायचे. म्हणून हॉटेलसारखे प्रथम फक्त वाटीभर सूप वा ताक प्यायचे. नंतर सलादची डीश संपवायची. एखादी वाटी अंकुरित कडधान्य खावून घ्यायचे. त्यानंतरच मुख्य जेवण – वरण, भात, भाजी, पोळी वाढून घ्यायचे व पोट भरुन जेवायचे. म्हणजे मग उपाशी न राहताही वजन कमी करता येईल. मग जेवतांना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.  
५. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षा ही जास्त वाढते. जेवण कमी न करता सुध्दा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजी पण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेल-तूप व साखर गूळ व हे ज्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारशे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत. 
६. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.
७. वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे. 
८. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.  
९. वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.
१०. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते. 
आहार शास्त्राचे काही मूलभूत नियम पाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.
अ. रोजची दोन जेवणे व नाश्ता इत्यादींमध्ये खालीलपैकी प्रत्येक गटातील एक पदार्थ असणे गरजेचे आहे.
         १. धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बारी
         २. द्विदल धान्ये – डाळी वा उसळी- तूर, चना, मूग, मटकी, बरबटी, उडीद
         ३. पालेभाज्या व ङ्गळभाज्या व ङ्गळे
         ४. उर्जा देणारे पदार्थ- स्निग्ध पदार्थ – तेल, तूप, लोणी, व साखर, गूळ
         ५. प्राणीज पदार्थ = दूध, दही, ताक  वा मांसाहारी पदार्थ – अंडी, मासे, मटन
ब. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त राहील. कच्चा भाजीपाला सलादच्या स्वरुपात भरपूर खाल्ला पाहिजे. भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम,
क. जेवणामध्ये जास्त उर्जेचा साठा असणारे पदार्थ हे कमीच असावेत.
ड. आपली स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरुन घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते व वजन वाढते.
हे झाले दिसणार्‍या स्वरुपातील स्निग्ध पदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. हे पण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करतांना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.
यावर खात्रीलायकरित्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करुनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच सर्व भागवावे.
साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम  साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.
ताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची. ताजे म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या मूळ अवस्थेत अन्न पदार्थ वापरणे. निसर्गात तयार झालेल्या वस्तू फार काळ टिकत नाही. त्या टिकाव्यात म्हणून त्यावर नाना प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. उदा. कैर्‍या वर्षभर खाता याव्यात म्हणून लोणचे बनवून टिकवावे लागते. तेल जास्त दिवस चांगले रहावे यासाठी रिफाईनिंग सारख्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. तांदूळ जास्त दिवस टिकावेत म्हणून पॉलिशिंग करावे लागते. कारण पॉलिश केलेल्या तांदूळाला किड लवकर लागत नाही. पण त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य कमी होते. 
स्वच्छ म्हणजे केवळ दिसण्याच्या बाबत नाही; तर रसायनमुक्त अन्न, निसर्गात तयार झालेल्या मूळ स्वरुपातील ताजे अन्न म्हणजे स्वच्छ. कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. आज शेतीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात खते व किटकनाशकांचा वापर केला जातो की जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात त्यांचे अंश शिल्लक राहतात व ते आपल्या शरीरात सुध्दा जातात. ती शरीरात गेल्यावर त्यांचे नेमके काय होते, ते शरीरात किती दिवस साठविले जातात, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अद्याप पावेतो तरी विज्ञानाला फारशे कळलेले नाही. पण यातील बहुतेक सर्व रसायने ही अत्यंत जहाल विषारी पदार्थ असून, त्यांचा थोडाही अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरु शकतो असे मानण्यास बराच आधार आहे. त्यामुळे रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल. 
त्याचप्रमाणे अन्नपदार्थ जास्त टिकले पाहिजेत यासाठी (शेलफ लाईफ वाढविण्यासाठी) त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यात येतात. यातील बर्‍याचशा प्रक्रिया या रासायनिक पदार्थांचा वापर करुन केल्या जातात. या रसायनांचे अंश मानवी शरीरात जातात. हे सर्व अस्वच्छ अन्न होय. ते कमीत कमी खायला हवे.
महात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. काय खावे व काय खावू नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार !
बिनातेलाची फोडणी : आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या बनवितांना फोडणी देणे हा प्रकार असतोच. कढईतील तेल तापले की त्यामध्ये आधी मोहरी व जीरे टाकायचे. ते तडतडते व फुटायला लागते. मग त्यात हिंग, हळद व इतर मसाल्याचे पदार्थ टाकायचेत. काही वेळा लसण, अद्रक व कांदा बारीक करुन टाकल्या जातो. हे सर्व मिश्रण तेलामध्ये भाजून झाले की त्यात भाजी वा जे काही बनवायचे तो पदार्थ टाकायचा; रस्सेदार भाजी बनवायची असेल तर पाणी घालायचे, सुकी भाजी बनवायची असेल तर तशीच कोरडी शिजवायची. अशा पध्दतीने भाज्या, आमटी वा अन्य पदार्थ बनविल्या जातात. काही वेळा फोडणी तयार झाली की ती कोशिंबिर, काही भाज्या, वरण यासारख्या पदार्थावर वरुन टाकायची अशी पण पध्दत आहे. 
तेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्‍न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. त्यामुळे तेलातूपाचे पथ्य सांगितले की बहुतेकांना ते अशक्यच वाटते. कारण तेलतूप खायचे नाही म्हणजे मग फक्त उकडलेलेच खायचे असा बहुतेकांचा समज होतो. असे उकडलेले बेचव अन्न आयुष्यभर कोण व कसे खाणार हा यक्षप्रश्‍न पडतो. तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात हे लगेच ध्यानात येत नाही. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्‍या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही. 
तेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्‍चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. कधी पाहिले-ऐकलेले नसते म्हणून तसा समज आहे. यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा. मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्‍न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही.
अशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल. चवीचा व तेलाचा संबंध आपल्या डोक्यात पक्का बसलेला असल्याने फक्त असे वाटेल. हा संबंध पूर्णपणे काढून टाकावा लागेल. 
==============

Categories
Uncategorized

आपले वजन : आपल्या जीवनशैलीचे निदर्शक

आपले वजन : आपल्या जीवनशैलीचे निदर्शक

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयास द्वारा “हृदयविकार निवारण व प्रतिबंध” या विषयावर जागृतीसाठी विविध उपक्रम राबवितांना समोर आलेला सर्वात महत्वाचा प्रश्‍न म्हणजे वाढलेले वजन कसे कमी करावे ? तसेही एकूणच या विषयबाबतचे असलेले अज्ञान व बर्‍याचशा चुकीच्या समजूती लक्षात येत होत्या. आपले वजन किती असावे, ते का वाढते, वाढलेले वजन कसे कमी करता येवू शकते, इत्यादि प्रश्‍नांबाबत शास्त्रशुध्द पण व्यावहारिक माहिती सामान्य लोकांना तर नाहीच, आम्हा डॉक्टरांनाही नेमकेपणाने नसते. या सर्वाचा परिणाम वजन कमी करणे म्हणजे काहीतरी अशक्य व अतिशय कठीण अशी बाब वाटते. बरेचसे लोक मग काहीतरी शार्टकट शोधण्याच्या मागे लागतात. प्रयत्न करुन ही वजन कमी न झाल्याने हताश होवून आशा सोडून देतात. आमच्या मागील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे वजन आटोक्यात ठेवणे तेवढेसे कठीण नाही हे समजले. याबाबत अनेक पुस्तकांच्या वाचनातून, तसेच वजन कमी करण्यासाठी प्रत्यक्ष सल्ला देतांना व दिलेला सल्ला अमलात आणतांना येणार्‍या अडचणींवर व्यवहार्य व सहजसाध्य उपाय शोधून काढता आले. त्यांचा अनेकांना आपली वाढलेली वजने कमी करायला अतिशय उपयोग झाल्याचे दिसून आले.

पहिला

उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर वाढणे), हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, सांधेदुखी, स्पॉंन्डीलायटीस यासारख्या अनेक आजारांचे एक महत्वाचे कारण म्हणजे वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे. एवढेच नव्हे तर वजन हे आरोग्याचे व एकूणच जीवनशैलीचे सहज मोजता येण्याजोगे निदर्शक आहे. वजन योग्य तेवढे राखता येण्यासाठी ज्या प्रकारची जीवनशैली आवश्यक असते, त्याद्वारे अनेक आजारांचा सहजच प्रतिबंध करता येतो.

आज भारतामध्ये शहरी लोकांमध्ये जवळपास ५०-६० % लोक हे प्रमाणापेक्षा जास्त वजनदार आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. मुख्यत्वे बैठी जीवनशैली व गरजेपेक्षा जास्त व चुकीचा आहार यामुळे असे होत आहे. आधुनिक सुखसुविधांमुळे आपल्याला नको असणारे श्रम वाचतात हे खरे; पण त्यामुळेच आपल्याला नको नकोसे असणारे चरबीचे थरही शरीरावर जमा होतात.

आपले वजन किती असायला पाहिजे ते ठरविण्यासाठी वेगवेगळी सूत्रे आहेत. त्यापैकी सर्वात सोपे सूत्र म्हणजे, वयाच्या २०-२२ व्या वर्षीचे वजन आयुष्यभरासाठी आदर्श असते हे होय. त्यामुळे त्यात भर पडू देवू नये. त्या वजनात झालेल्या दर किलो वाढीमागे, हे आजार होण्याचा धोका २% ने वाढतो. 

साधारणत: शरीराची वाढ २०-२२ व्या वर्षी पूर्ण होते. त्यानंतर वजनात भर पडते ती एकतर व्यायामाद्वारे स्नायू व हाडांच्या वजनात भर पडल्याने किंवा जास्तीची चरबी जमा झाल्याने. स्नायू व हाडांमध्ये भर पडल्याने वजन वाढलेले असल्यास चांगलेच आहे. मात्र चरबी जमा झाल्याने वजनात भर पडलेली असल्यास मात्र धोक्याची बाब आहे. बहुसंख्य लोकांच्या वजनात वयाच्या २०-२५ नंतर भर पडते ती जास्तीची चरबी जमा झाल्याने. वजनात जवळपास १२५ ते १५० % वा जास्तच भर पडते. त्यामुळे आजारांचा धोकाही वाढतो.

वरील सूत्र शास्त्रीय वाटत नाही ना ? कारण आम्हाला सवय झालेली आहे की विज्ञान एवढे साधे, सोपे कसे काय असेल ? विज्ञान म्हणजे काहीतरी लवकर न समजणारे, अवघड, तांत्रिक असा आमचा (गैर) समज झालेला असल्याने असे होते. मुळात विज्ञान हे सर्वांना सहज समजणारे व सामान्य लोकांच्या आवाक्यात असते. पण दुर्दैवाने ते एकतर प्रयोगशाळेत (लॅबोरटरीज) वा तज्ञांच्या डोक्यात अडकलेले दिसते. प्रत्यक्ष जीवनात ते कमीच आढळते.

वाढलेले वजन कमी केल्यास, दर किलोमागे सरासरी २ ते ३ महिन्यांनी आयुष्य वाढते असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. असेही म्हणतात की कॅन्सरवर रामबाण औषध सापडले व येथून पुढे कोणीही कॅन्सरने दगावले नाही, तर मानवजातीचे सरासरी आयुष्यमान दोन वर्षांनी वाढेल. या तुलनेत जर सर्वांना आपापली वजने योग्य प्रमाणात राखता आली, तर मात्र मानवजातीचे सरासरी आयुष्यमान ८ वर्षांनी वाढेल. म्हणून वजन योग्य त्या प्रमाणात राखणे एवढे महत्वाचे आहे. शिवाय वजन कमी करणे हे कॅन्सरवर औषध शोधण्यापेक्षा कितीतरी सोपे व सहजसाध्य, तसेच बिनाखर्चाचे आहे. 

वजन किती असावे यासाठीचे दुसरे सर्वमान्य सूत्र बी. एम.आय : (बॉडी मास इंडेक्स) यासाठी, वजन भागिले ऊंचीचा वर्ग (मीटरमध्ये) हे सूत्र वापरतात. हे गुणोत्तर  १८.५ ते २१ असावे. बी. एम.आय २१ पेक्षा जसाजसा वाढेल, तसा आजार होण्याचा धोका ही वाढत जातो. या सूत्रानुसार सर्व प्रौढांसाठी किती उंचीला किती वजन असावे ते काढता येते. 
बी. एम.आय = वजन भागिले उंचीचा वर्ग (मीटर मध्ये)

ं  १८.५ ते २१ दरम्यान असेल तर चांगले. हृदयविकार, डायबिटीस इत्यादी आजार होण्याचा धोका कमीत
    कमी.
ं  २१ ते २५ असेल तर बॉर्डर लाईन वजन, विशेषत: डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. पर्यायाने
    हृदयविकाराचा ही.
ं  २५ ते ३० असेल तर, वजन जास्त व लठ्ठपणाची सुरुवात. आजारांचा धोका जास्त. वजन लगेच कमी
     करायला हवे.
ं  ३० पेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणा, ताबडतोब उपचार सुरु करायला हवेत. आजारांचा धोका सर्वाधिक.

वजन जास्त असल्यास हाडांचे व सांध्यांचे आजार ही जास्त होतात. कारण वजन जेवढे जास्त तेवढी सांध्यांची झीज जास्त होणार. त्यामुळे गुडघे लवकर कामातून जातात व कंबर दुखणे पण सुरु होते. म्हणून वजन नियंत्रणात ठेवायला हवे. या दोनही सूत्रांनुसार आपले वजन किती असायला हवे हे ठरविता येईल.

वेस्ट : हिप (कंबर : नितंब) रेशो : कमरेचा घेर हा नितंबाच्या घेरापेक्षा लहान हवा. हा रेशो ०.८५ पेक्षा जास्त नको. कमरेचा घेर हा केंव्हाही ३६ इंचापेक्षा जास्त नको. भारतीय पुरुषांमध्ये चरबीचा साठा मुख्यत्वे पोटाभोवती होत असल्याने हा बराच जास्त असतो. चरबी जमा झाल्याने पोटाचा घेर वाढणे, बहुधा पुरुषांमध्ये घडते व हे जास्त घातक असते. त्यासाठी पोटाचा घेर हा कमरेच्या तुलनेत कमी असला पाहिजे. यासाठी पुरुषांनी प्यांट ढिली होते आहे की घट्ट, याकडे लक्ष असू द्यावे. पोट आणि छाती एका सरळ रेषेत असायला हवी. छातीचा घेर हा पोटाच्या घेरापेक्षा थोडा जास्त असावा. निदान सारखा तरी असावा. 

वजन का वाढते व ते कसे कमी करायचे ते आता आपण पाहू या.

शारीरिक वाढ २०-२२ व्या वर्षी पूर्ण होते. त्यानंतर वजन वाढते ते, एकतर व्यायामाद्वारे स्नायूंमध्ये भर पडल्याने किंवा जास्त करुन चरबी जमा झाल्याने. स्नायू बळकट होवून वजनात भर पडली असेल तर, चांगलेच आहे. पण चरबी जमा झाल्याने वजनात भर पडल्यास मात्र धोका वाढतो. बहुधा तसेच घडते, म्हणून या वयानंतर वजनात भर पडू देवू नये. 

हल्ली बरीचशी मुले लहान वयापासूनच लठ्ठ असतात. कारण शरीरश्रम नसणे (तास न तास टीव्ही, कम्प्युटर समोर बसणे, मैदानी खेळ न खेळणे) व चुकीचे व भरपूर खात राहणे (फास्स्ट फुड, मिठाया, तळलेले चमचमीत पदार्थ). हा झाला भविष्यकाळासाठीचा धोक्याचा इशारा. असे असल्यास लहान वयापासूनच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी  काळजी घ्यावी लागेल.

शरीरातील चरबीचा साठा वाढून वजन वाढते, ते खाणे जास्त व शरीरश्रम कमी या असतुंलनामुळे. हे असंतुलन बदलवले की वाढलेले वजन कमी व्हायला लागते.  केवळ आहार नियंत्रणाने थोडा काळपर्यंत वजन नियंत्रण शक्य होईल. कायम नियंत्रणासाठी मात्र व्यायाम करुन शरीराचे स्नायू वाढविणे आवश्यक असते. स्नायू वाढलेत की शरीरातील भट्टी जास्त जोरात जळते; म्हणजेच चयापचयाचा वेग (बीएमआर) वाढतो. त्यामुळे शरीरातील चरबी लवकर कमी होते. स्नायू वाढविण्यासाठी  व्यायाम आवश्यक आहे. अशा प्रकारे वजन नियंत्रणासाठी, व्यायाम व आहार नियंत्रण हे दोन्ही करायला हवे. 

चरबी वाढवणारे सर्वात महत्वाचे दोन अन्नघटक म्हणजे स्निग्ध पदार्थ व साखर. स्निग्ध पदार्थामध्ये  प्रति गॅ्रम ९ किलोकॅलरीज असतात. शिवाय श्रम करून कॅलरीज वापरल्या नाही, तर या खाल्लेल्या स्निग्ध पदार्थांची ९७% चरबी बनते. साखर किंवा (कर्बोदके) कार्बोहायड्रेट्समधे, प्रति ग्रॅम ४ किलोकॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी साखर व तेलतूपादि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवणे सर्वात महत्वाचे.  

डॉ. अविनाश सावजी 
अध्यक्ष, अमरावती जिल्हा योग असोसिएशन, व संचालक, प्रयास 
दंडे प्लॉटस्, राजापेठ, अमरावती. ४४४ ६०५
संपर्क : (०७२१) २५७३२५६, मोबा. ९४२०७ २२१०७) 

==================

Categories
Ageing Fittnesss Life Style Nutrition Positive Health Yoga

शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !

शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी ! 
डॉ. अविनाश सावजी 

माणसाला आपले आयुष्य कसे लांबविता येईल व तारुण्य दिर्घकाळपर्यंत कसे टिकविता येईल यासंदर्भात आज जगामध्ये भरपूर संशोधन सुरू आहे. माणसाची आर्युमर्यादा तर एकीकडे बरीच वाढलेली आहे. या वाढत्या आर्युमर्यादेसोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, हार्ट अटॅक यासारख्या आजारांचे प्रमाणसुध्दा वाढते आहे. त्यामुळे मिळालेले जास्तीचे आयुष्य निरामय कसे जगता येईल हा जगभरातील संशोधकांच्या संशोधनाचा महत्वाचा विषय बनलेला आहे. यासाठी काय करायला हवे याचे स्पष्ट दिशा दिग्दर्शन, आतापर्यंतच्या संशोधनाद्वारे करण्याच्या स्थितीमध्ये आता विज्ञान येवून पोहचलेले आहे.

या संदर्भामधील संशोधनातून असं लक्षात आलं की, जगामध्ये सगळ्यात जास्त शतकवीर, म्हणजे शंभरी पार केलेल्या व्यक्तींची संख्या, दक्षिण रशियामधील जॉर्जिया या प्रांतामधील अबखासीया या, कॉकेशस पर्वत रांगानी व्यापलेल्या पर्वतीय प्रदेशामध्ये राहणार्‍या जनजातीय लोकांमध्ये आहे. जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा या लोकांमध्ये शंभर वर्षापेक्षा जास्त जगणार्‍या व्यक्तींची संख्या काही पटीने अधिक आहे. त्यामुळे संशोधकांचं आणि डॉक्टरांचं लक्ष या विशिष्ट जमातीकडे वेधल्या गेलं. या लोकांच्या जीवनशैलीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ते दिर्घकाळपर्यंत आणि निरोगी जगतात, यासाठी त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला गेला. या अभ्यासामधून या लोकांच्या दिर्घायू जगण्याचं आणि तारूण्य टिकविण्याचं रहस्य लक्षात आलं. त्यांच्या जगण्यामध्ये प्रामुख्याने चार तत्वं शास्त्रज्ञांना आढळली.

 ही चार तत्वे जगामध्ये इतरत्रही दिर्घकाळ जगणार्‍या व आपले तारुण्य टिकवून ठेवणार्‍या लोकांच्या जीवनशैलीच्या अभ्यासातून स्पष्ट झालेली आहेत. अगदी आपल्या गावातील ८०-९० वय गाठलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास केला तरी, या तत्वांची पुष्टी आपल्याला स्वत:ला करुन घेणे पण सहज शक्य आहे. त्या तत्वांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अवलंब ज्या प्रमाणात करता येईल, त्या प्रमाणात आपल्यालाही दिर्घकाळ पर्यंत निरामय जीवन जगता येईल व तारूण्यसुध्दा टिकविता येईल ही खात्री देता येवू शकते. ती तत्वे कोणती हे आपण समजून घेऊ या.

 १. शास्त्रज्ञांना हे आढळून आलं की येथील लोकांचा आहार हा ताजा व स्वच्छ आहे. (Clean & Fresh Diet) दिर्घायू बनण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शेतामध्ये पिकलेला भाजीपाला वा फळे, कुठल्याही प्रकारे साठवणूक न करता वापरणे, म्हणजे ताजेपणा होय. याचा अर्थ निसर्गामध्ये खाण्याची वस्तू तयार होणे व आपल्या आहारामध्ये तिचा प्रत्यक्ष समावेश होणे, यामधील कालावधी हा कमीत कमी असणे म्हणजे ताजेपणा. दिर्घकाळपर्यंत ताजेपणा टिकवून राहण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा, प्रिजर्वेटीव्हचा वा अन्य निरनिराळ्या पध्दतींचा वापर करणे, म्हणजे ताजेपणा नव्हे. आज बहुतेक सगळ्याच खाद्य पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रियांचा अवलंब मुख्यत्वे वाहतुकीच्या सोयीसाठी आणि दिर्घकाळ पर्यत टिकवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य तर कमी होतेच. शिवाय या सर्व रसायनांचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. म्हणून अशा प्रक्रियायुक्त पदार्थाचा वापर कमीत कमी करायला हवा. अगदी फ्रिजमध्ये ताजे दिसत असणारे पदार्थ सुध्दा ताजे नव्हेत.

निसर्गामध्ये ज्या अवस्थेमध्ये खाद्यपदार्थ तयार होतात, तेथून प्रत्यक्ष मानवी वापराची सुरवात, यामधला कालावधी कमीत कमी असण्यासाठी गरजेचं असेल की, आपले खाद्य-पदार्थ हे आपल्या परिसरातच तयार झालेले असावेत. कुठेतरी दूरवर जगाच्या कोपर्‍यात पिकविले गेलेले फळ किवा अन्य खाद्यपदार्थ, शेकडो-हजारो किलोमीटर लांबवरच्या लोकांना वापरता यावे यासाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे आपल्या परिसरात तयार होणारी, पिकविल्या जाणारी फळे व भाजीपाला, तसेच ज्या सिझनमध्ये ती तयार होतात त्याच काळात ती वापरणे म्हणजे ताजेपणा होय.

गांधीजीनी यासंदर्भात एक फार सोपे सूत्र सांगितले आहे. त्याहून सोपे आहार शास्त्र काही असू शकत नाही. गांधीजी असे म्हणतात की, ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात त्या वस्तू आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू खूप दिवस न नासता, न खराब होता टिकून राहतात, बहुधा त्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. उदा. आज तयार केलेली पोळी, भाकरी, भात उद्या शिळा होतो व त्यावर लगेच बुरशी येते व ते खाण्यालायक उरत नाही. म्हणजेच पोळी, भाकरी, भात खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. या उलट कारखान्यात तयार झालेले बिस्कीट किंवा वेगवेगळ्या पॅकींगच्या वस्तु ज्या खूप दिवस पर्यंत चांगल्या राहतात, खराब होत नाही अशा गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. त्या ताज्या दिसत असल्या तरी त्यातील ताजेपणा संपलेला असतो.

आपल्या ताजेपणाच्या संकल्पना अर्धवट आहेत. बहुतेक घरांमध्ये अशी पध्दत दिसते की, नळ आलेत की, पिण्याचे पाणी भरताना कालचे भरलेले पाणी हे सांडून दिल्या जाते व ताजे पाणी भरल्या जाते. जर पाण्याच्या संदर्भामध्ये ताजेपणाची अशी संकल्पना आपण वापरतो तर ती आपल्याला आहाराच्या बाबत सुध्दा वापरायला पाहिजे. अशा पध्दतीचा ताजा आहार माणसाचे आयुष्य वाढविते व तारूण्य टिकवते.

 आहारा संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे स्वच्छ असणे. स्वच्छ याचा अर्थ केवळ दिसायला स्वच्छ असा नाही. तर ज्यामध्ये मूळ पदार्थाशिवाय इतर कुठल्याही गोष्टी नाहीत ते अन्न म्हणजे स्वच्छ होय. आज ज्या वस्तु स्वच्छ दिसतात त्या बहुदा स्वच्छ नसतात; (उदा. बहुतेक सर्व पॅकींगच्या वस्तू) कारण त्या स्वच्छ दिसण्यासाठी त्यांच्यावर खूप सार्‍या प्रक्रिया कराव्या लागतात वा त्यामध्ये वेगवेगळी रसायने वापरावी लागतात. असे अन्न म्हणजे अस्वच्छ अन्न. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेमध्ये कोणत्याही रसायनांशिवाय तयार होणारा भाजीपाला व फळे वापरणे मानवी आरोग्यासाठी चांगले आहे. वेगवेगळी रसायने वापरून पिकवल्या जाणार्‍या, शेतीमधील धान्य, डाळी, भाज्य-फळे हे स्वच्छ नाहीत. त्यामुळे रसायनमुक्त अन्न म्हणजे स्वच्छ अन्न हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अशा रसायनमुक्त व नैसर्गिक पध्दतीने तयार होणार्‍या खाद्य पदार्थाच्या सेवनाने माणसाचे आयुष्य वाढविता येते व तारूण्य टिकवता येते असं आज विज्ञान सांगते आहे.

 २. दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी दुसरे महत्वाचे तत्वजे शास्त्रज्ञांना आढळले ते म्हणजे, तेथील समाजातील लोक अखेरपर्यंत शरीरश्रम करतात. अगदी एकशे दोन वर्षाचा म्हातारा सुध्दा, तास-दोन तास शेतीमध्ये काम करतो. शंभर वर्षाची म्हातारी सुध्दा तास दोन तास घोड्यावरून रपेट मारून येते; घोड्यावर बसणे हा तेथील लोकांचा छंद आहे. याचाच अर्थ घाम गाळल्याशिवाय माणसाला आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकवता येत नाही. दुदैवाने आज आमचे सगळे प्रयत्न हे घाम कमीत कमी निघावा या दिशेने सुरू आहेत. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानवी शरीरश्रम दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. आजच्या जगाचे मुख्य आजार म्हणजे हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर वाढलेले असणे, डायबिटीस, वजन प्रमाणापेक्षा जास्त असणे व लठ्ठपणा, हे सर्व शरीरश्रमाच्या अभावामुळे निर्माण होणारे आजार आहेत. शरीरश्रम केल्याशिवाय माणसाला दिर्घायू होता येत नाही व तारूण्य टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे आपल्या जगण्यामध्ये शरीरश्रमाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या दिनचर्येमध्ये ते नियमाने कसे करता येतील हे ज्याचे त्याने ठरवायला पाहिजे.

 आज शरीरश्रमापेक्षा बौध्दिक श्रमाला जास्त महत्व व किमत आलेली आहे. शरीरश्रमाला हलके मानले जाते. हा फरक कमी करणे एकूणच मानवी आरोग्यासाठी गरजेचे आहे. खासकरुन प्रत्येकाने जर उत्पादक श्रम आपल्या दिनचर्येचा भाग बनविला तर, आज समाजामध्ये दिसणारी वेगवेगळ्या प्रकारची विषमता सुध्दा कमी होईल. सर्वांचेच आरोग्य सुधारेल.

बैठी जीवनशैली असणार्‍यांसाठी शरीरश्रम हे अमृत व संजीवनी देणारे औषध आहे. त्यामुळे दिनचर्येमध्ये शरीरश्रम करत राहणे वा तशाप्रकारची जीवनशैली शक्य नसेल तर, जाणिवपूर्वक व्यायामासाठी वेळ राखून ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. असे केले तरच आपल्याला वाढत्या वयासोबत होणारे आजार टाळता येणे शक्य होईल.

 ३. तिसरा मुद्दा जो त्या समाजाच्या अभ्यासामधून लक्षात आला तो म्हणजे त्या समाजामध्ये पारस्पारिकता आहे. परस्परांमध्ये घट्ट संबंध व एक-दुसर्‍याच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्या जमातीच्या दिर्घायू जगण्याचे आणि तारूण्य टिकवण्यामागचे हे तिसरे रहस्य आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ‘शेअरींग ऍन्ड केअरींग’ म्हणतात ते केल्याशिवाय माणसाला आपले आयुष्य वाढविता येत नाही वा तारूण्य टिकविता येत नाही असं आज आपल्याला विज्ञान सांगते. दुदैवाने आज आम्ही ना तर सुख वाटून घेत, ना तर दु:ख; प्रत्येकजन आपापल्या स्वार्थी आणि आत्मकेंद्रित वर्तुळात जगण्यामध्ये मशगुल झालेला आहे. अशाप्रकारच्या आत्मकेंद्रित जगण्याने आपले आयुष्य कमी होते व म्हातारपण लवकर येवू शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे; आणि मग आमची इच्छा असो वा नसो, आम्हाला जर मग लवकर मरायचं नाही आणि लवकर म्हातारं व्हायचं नाही, तर मग स्वत:ची व इतरांची सुख-दु:ख वाटून घ्यायला शिकावं लागेलं. हे केलं तरच आमचं आरोग्यसुध्दा टिकविता येऊ शकेल.

     आज वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरीकरण वाढत आहे. एकूणच जगणे सुपरफास्ट होत चाललेले आहे. जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेच्या रेट्यामुळे व वाढत्या चंगळवादापायी मानवी जीवनातील सहजता संपत चालली आहे. मानसिक तणाव वाढत चालला आहे. मानवी नात्याची वीण पार उसवून चुकली आहे. त्यामुळे आयुष्याची लांबी वाढूनही, वाढीव आयुष्यात सुख भोगणे माणसाच्या नशीबामध्ये दिसत नाही. या सगळ्यांचा विचार करता माणसाला आपल्या आयुष्याची लांबी वाढवितांना, आयुष्याची खोली कशी वाढविता र्यईल याचासुध्दा विचार करणे अगत्याचे झाले आहे.

४. चौथा मुद्दा जो लक्षात आला तो म्हणजे त्या लोकांच्या जगण्यामागे दिर्घकाळ आणि निरामय आयुष्य जगणे हा हेतू आहे. म्हणून ते लोक दिर्घायू होतात व तारूण्य टिकवितात. याचाच अर्थ माणसाला दिर्घायू होण्यासाठी आणि तारूण्य टिकविण्यासाठी जगण्याचा हेतू शोधायला हवा. ज्यांच्या जगण्यामागे काही हेतू आहे तेच लोक जास्त काळपर्यत जगू शकतात व म्हातारपण दूर ठेवू शकतात. मग माझ्या जगण्याचा हेतू काय आहे ? असा प्रश्‍न आमच्या पैकी किती लोकांना पडतो ? केवळ मरत नाही म्हणून जगतो आहे, अशाप्रकारचे जगणे आज आमच्या पैकी अनेकंाचे सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जगण्याचा हेतू शोधता येणं अत्यंत जरुरीचे बनले आहे. ते करता आले तरच आम्हाला आमचे आयुष्य वाढविता येईल व म्हातारपण दूर ठेवता येईल असं आज विज्ञान सांगते.

त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घेता यायला पाहिजे. एक म्हणजे जसे आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये राहणार्‍या सहाशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नसतात. मग जर एवढ्या लोकांमध्ये दोन व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे सुध्दा सारखे नाहीत, याचाच अर्थ माझ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, जे जगामधील अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही. (देअर ईज समथींग स्पेशल इन माय सेल्फ) त्यामुळे माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे, काय स्पेशल आहे, याचा शोध घेणे हा माणसाचा जगण्याचा हेतू असू शकतो. एका बाजूने माझ्यामध्ये असे काय आहे की, जे जगामध्ये इतर कोणामध्येच नाही याचा शोध घेणे आणि दुसर्‍या बाजूने एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी समान आहे; (देअर ईज समथींग कॉमन अमँगस्ट अवरसेल्फ) मग हे कॉमन, हे समानत्व कोणते आहे याचा शोध घेणे. अशाप्रकारे एका बाजूने माझ्यामध्ये स्पेशल, माझ्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा शोध घेणे आणि दुसर्‍या बाजूने आपल्या सगळ्यांमध्ये काय समानत्व आहे याचा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ देतो. कदाचित हा माणसाच्या जगण्याचा हेतू असावा. असा शोध लागणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेऊ शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोली सुध्दा आपोआप वाढेल.

या सगळ्या तत्वांचे आपल्या जीवनशैलीमध्ये जागरुकतेने व डोळसपणे पालन करता आले तर, दिर्घायू बनने व तारूण्य टिकवून ठेवणे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे असे आज विज्ञान आपल्याला सांगत आहे.

Categories
camp motivation Sevankur youth

Sevankur camp Aurangabad – 27- 29 May 2011

Sevankur Motivation Camp, Aurangabad
27-29 May 2011 Brief Report

This is a brief report with some photos of Sevankur Motivation camp, held at Aurangabad, on 27-29 May 2011. This was the first Sevankur camp held at Aurangabad. It was organised at “Chatanya Agro Tourism Centre” 25 kms from Aurangabad, near Ellora, a very natural & lovely place. All the logistics had been taken care of by Shri Harish Jakhete & his close friends Shri Sushil Pipada, Manoj Somani & others with their family members. All the arrangements including the finances have been taken care by them. They have done everything with so much of love & affection that everybody felt as if they are at their maternal uncle’s home. Association of Shri Harishbhai & friends is the greatest achievement of this Sevankur camp. They are all successful businessmen & very compassionate & ever ready to support social cause. We enjoyed all the natural living with clean & fresh air, simple food prepared & served with full of love & affection, lot many fresh ripen mangoes, given directly by the mango trees, all the meetings held in the mango trees garden.

In this 3 days residential camp, there were around 50 participants from Aurangabad, Jalna, Beed, Buldana, Akola, Washim, Jalgaon, Pune, Mumbai, Latur, Nanded & Kolhapur districts. This was the first Sevankur camp with such a small no. of participants. Otherwise all the 11 camps held till now had more than 150 participants. Though the no. was small, they are very selective & also from the diverse background. There were three blind friends also amongst them.

All the sessions were very much insightful, as the resource persons are from different background. Each one of them had done a great contribution to the society in their respective fields.

1. Shri Ramchandra Bhogale, Aurangabad – A leading industrialist, who is leading one of the prominent group of industries “NIRLEP”. They are having yearly turnover of around Rs. 350 crores & having around 800 direct employees & around 2000 indirect. He is a very down to earth person, having great vision & multidimensional cheerful personality. He is also involved in various social organisations. He told the stories of how his most of the new industries started out of the obstacles they faced. He had given many tips for leading a successful & enriched life.

2. Dr. Girish & Prajakta Kulkarni, Snehalaya, Ahemadnagar – A wonderful, complimentary, “made only for each other” kind of couple, both are having deep respect & strong bond of faith about each other. The participants get moved by all these & realised the importance of this important aspect of life. Both of them shared the present activities of Snehalaya & what & how the interested Sevankur participants can contribute for social cause. They are closely associated with Sevankur since beginning. Snehalaya is the organisation known for the splendid work for the welfare & rights of Commertial Sex workers, their children, HIV & AIDS sufferors & many other areas in Ahemadnagar district.

3. Shr. Rajesh Thombare, Chalisgaon, Dist. Dhule – 42 years young miracle, who is alive inspite of 32 poisonous snake bites. He is most compassionate & very much friendly about Snakes. “Both the Snakes & Human Beings should remain alive” is his life mission. Though an arts graduate (BA), having experienced a very bad poverty, had been successful in establishing a 20 bedded Intensive Care Unit with 6 Ventilators at a small town like Chalisgaon with people’s participation. This center had treated 25000 cases of snake bites with Zero mortality. He trained thousands of rural & urban people regarding the Snake science, first aid & treatment of snake bites. Many doctors call him for guidance. He is a reference manual of the subject.

4. Dr. Sanjiv Saoji, psychiatrist, Aurangabad – A leading psychiatrist of Aurangabad with strong social attitude & contribution. He has worked for creating awareness regarding the mental health by writing in mass media, public speeches, workshops & training programs etc. He is associated with many social organisations at Aurangabad. He discussed various issues regarding the mind & the mental health & answered the questions raised by the participants. These were quite useful while working for social change.
5. Santosh Garaje, Gevrai, Dist. Beed – A 26 years young IDOL of Sevankur, parent of 35 destitute children of “Sahara Parivar”. He is from a migrant sugar cane labour family. His elder sister died leaving back her small kid of one year, when Santosh was 19 years old. This incidence touched & moved him to undertake his life mission of working for such destitute children. He started with 6 children in 2004 & now running a hostel for 35 children. He is living with them for 24 hours by 365 days. He takes care of all the developmental needs of the children. He has to work very hard for raising the necessary resources for the running expenses of the hostel. He have a dream of having their own building of hostel in future.
Because of the comparatively small group size, we could have deep interaction amongst the participants. We could learn about their challenging life journey. These were the most moving moments of the camp.

Rajesh Jaibhaye (Sindkhed raja, Dist. Buldana) 20 years boy, from a small village, educated upto 8 standard, with wonderful skills of singing, communication etc. He had been to 100 + schools till now & had presented a program to make children aware regarding good habits, national pride etc.

Our immediate next Sevankur camps are proposed on July 27-28-29 at Jalgaon/Dhule & in August (first or second week end) at Beed.

In addition to this I had been to the following youth camps organised by different organisations.
1. Youth camp at Hasegaon, Latur by Sevalaya – 1 May – 50 participants
2. Shram Sankar Camp, Somnath, Chandrapur district 15-22 may – 750 participants
3. Shram Sankar Camp by Sane Guruji Smarak Trust, At Amalner, Dist Jalgaon – 26-31 may – 150 participants

4. IAS Academy, At Amravati – 11-19 May – 400 participants

Coming Soon

Prayas Sevankur
Privacy Overview

This website uses cookies so that we can provide you with the best user experience possible. Cookie information is stored in your browser and performs functions such as recognising you when you return to our website and helping our team to understand which sections of the website you find most interesting and useful.